शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बापरे! एका मिनिटाला मोजावे लागतात 50 रुपये; मोबाईल सेवा बंद असल्याने नागरिक झाले त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 09:47 IST

काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे

श्रीनगर - तंगमर्गमधील जहूर अहमद मीर मागील शुक्रवारी 38 किमीचा पल्ला पार करत एका मित्राच्या कार्यालयात श्रीनगर येथे पोहचले. अहमद मीर यांना त्यांच्या मुलाला कॉल करायचा होता. तो जम्मूतील एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. जहूर यांना एक फोन कॉल करण्यासाठी इतक्या लांब जाण्याची गरज यासाठी पडली कारण पट्टन येथील एका दुकानदाराने त्यांचा लँडलाइन वापरण्यासाठी एका मिनिटाला 50 रुपयांची मागणी केली, हे ऐकून त्यांना धक्का बसला. 

काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने लँडलाइनचा वापर करावा लागतो. अशातच ज्यांच्याकडे लँडलाइन आहे ते पैसे कमाविण्याची संधी सोडत नाही. अनेक ठिकाणी पीसीओ उघडण्यात आले आहेत. सामान्य लोकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रासपणे होताना पाहायला मिळत आहे. बारामुल्लामधील पलहल्लन गावात राहणारे गुलाम हसन डार यांना बंगळुरुत आपल्या मुलाशी बोलण्यासाठी एका मिनिटाला 30 रुपये द्यावे लागले. त्यांनी सांगितले की, एक आठवडा झाला तरी त्यांचा मुलगा मुख्तारसोबत बोलणं होऊ शकलं नाही. याच कारण आहे की, मुलाचा आवाज ऐकण्यासाठी वडिलांना किंमत मोजावी लागते. 

श्रीनगर येथील रैनावरीत राहणारे सईद अफजल नेहमी लाल चौकातील त्यांच्या मित्राच्या कार्यालयात जातात. त्यांची मुलगी शबाना आणि नातिनो या दिल्लीत वास्तव्य करतात. अफजल यांनी सांगितले की, मी माझा छोटा मुलगा अफरोजसोबत गेल्या 6 आठवड्यापासून बोललो नाही. तो दुबईत राहायला आहे. मोबाईल सेवा कधी सुरु होईल अन् जनजीवन सर्वसामान्य होईल याकडेच काश्मीर खोऱ्योतील लोकांचे लक्ष आहे. फोन कॉलच्या बदल्यात जास्त किंमत वसूल करण्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.  जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविल्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काश्मीर खोऱ्यात मोबाईल सेवा, इंटरनेट यांच्यावर निर्बंध आणले आहेत. तसेच माध्यमांनाही जम्मू काश्मीरात वृत्तांकन करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात अनेक स्थानिक माध्यमांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काश्मीरमधील लोकांचा आवाज दाबला जातोय असा आरोप विरोधकांकडून सुरु आहे. कलम 144 लागू असल्याने अनेक ठिकाणी भारतीय जवान तैनात आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370