शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बापरे! एका मिनिटाला मोजावे लागतात 50 रुपये; मोबाईल सेवा बंद असल्याने नागरिक झाले त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 09:47 IST

काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे

श्रीनगर - तंगमर्गमधील जहूर अहमद मीर मागील शुक्रवारी 38 किमीचा पल्ला पार करत एका मित्राच्या कार्यालयात श्रीनगर येथे पोहचले. अहमद मीर यांना त्यांच्या मुलाला कॉल करायचा होता. तो जम्मूतील एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. जहूर यांना एक फोन कॉल करण्यासाठी इतक्या लांब जाण्याची गरज यासाठी पडली कारण पट्टन येथील एका दुकानदाराने त्यांचा लँडलाइन वापरण्यासाठी एका मिनिटाला 50 रुपयांची मागणी केली, हे ऐकून त्यांना धक्का बसला. 

काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने लँडलाइनचा वापर करावा लागतो. अशातच ज्यांच्याकडे लँडलाइन आहे ते पैसे कमाविण्याची संधी सोडत नाही. अनेक ठिकाणी पीसीओ उघडण्यात आले आहेत. सामान्य लोकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रासपणे होताना पाहायला मिळत आहे. बारामुल्लामधील पलहल्लन गावात राहणारे गुलाम हसन डार यांना बंगळुरुत आपल्या मुलाशी बोलण्यासाठी एका मिनिटाला 30 रुपये द्यावे लागले. त्यांनी सांगितले की, एक आठवडा झाला तरी त्यांचा मुलगा मुख्तारसोबत बोलणं होऊ शकलं नाही. याच कारण आहे की, मुलाचा आवाज ऐकण्यासाठी वडिलांना किंमत मोजावी लागते. 

श्रीनगर येथील रैनावरीत राहणारे सईद अफजल नेहमी लाल चौकातील त्यांच्या मित्राच्या कार्यालयात जातात. त्यांची मुलगी शबाना आणि नातिनो या दिल्लीत वास्तव्य करतात. अफजल यांनी सांगितले की, मी माझा छोटा मुलगा अफरोजसोबत गेल्या 6 आठवड्यापासून बोललो नाही. तो दुबईत राहायला आहे. मोबाईल सेवा कधी सुरु होईल अन् जनजीवन सर्वसामान्य होईल याकडेच काश्मीर खोऱ्योतील लोकांचे लक्ष आहे. फोन कॉलच्या बदल्यात जास्त किंमत वसूल करण्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.  जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविल्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काश्मीर खोऱ्यात मोबाईल सेवा, इंटरनेट यांच्यावर निर्बंध आणले आहेत. तसेच माध्यमांनाही जम्मू काश्मीरात वृत्तांकन करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात अनेक स्थानिक माध्यमांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काश्मीरमधील लोकांचा आवाज दाबला जातोय असा आरोप विरोधकांकडून सुरु आहे. कलम 144 लागू असल्याने अनेक ठिकाणी भारतीय जवान तैनात आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370