शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:46 IST

चंद्रावर उतरण्याआधीचा महत्त्वाचा टप्पा यशस्वी : लॅँडरच्या विलगीकरणाची कामगिरी फते

बंगळुरु : महिनाभरापूर्वी श्रीहरीकोटा येथून अंतराळात भरारी घेऊन चंद्राच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘चांद्रयान-२’मधील प्रत्यक्ष चंद्रावर उतरवायची ‘विक्रम’ (लॅण्डर) आणि ‘प्रज्ञान’ (रोव्हर) ही दोन उपकरणे मुख्य यानापासून अचूकपणे विलग करण्याची कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी सोमवारी फत्ते केली. यामुळे ‘विक्रम’ व ‘प्रज्ञान’च्या अवघड चांद्रवारीतील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला.

अंतराळात सोडलेल्या मूळ यानाचा ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ असलेला भाग गेले काही दिवस चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत होता. या तिन्हींची बांधणी एकत्रित होती. यापैकी ‘आॅर्बिटर’ पुढील चार वर्षे चंद्राभोवती घिरट्या घालणार आहे व ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ चंद्रावर उतरवायचे आहेत. त्यासाठी पुढील स्वतंत्र प्रवासासाठी या दोन उपकरणांना ‘आॅर्बिटर’पासून विलग करणे हा एक महत्त्वाचा टप्पा होता. ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार या विलगीकरणासाठीची सर्व स्वचलित यंत्रणा बसविण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे कामे पार पाडण्याची ‘कमांड’ भूनियंत्रण केंद्राकडून दिली गेल्यावर ही स्वचलित यंत्रणा कार्यान्वित झाली व सोमवारी दु. १.१५ वाजता ‘आॅर्बिटर’पासून ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ अचूकपणे विलग झाले. विलगीकरणानंतर या दोन्ही उपकरणांमधील सर्व यंत्रणा पूर्णपणे ठाकठीक आहेत, असेही ‘इस्रो’ने नमूद केले.ही दोन्ही उपकरणे येत्या ५ सप्टेंबर रोजी पहाटे १.५५ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात अलगदपणे उतरविली जायची आहेत. चंद्रावर उतरणे सुरु करण्याआधी त्यांना चंद्राच्या ३६ बाय १०० किमीच्या सुयोग्य कक्षेत आणावे लागेल. त्यासाठी मंगळवारी व बुधवारी कक्षा सुधारण्याची दोन कामे केली जातील.चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावणाऱ्या ‘लॅण्डर’चा वेग हळूहळू नियंत्रित करणे व आतील अत्यंत नाजूक यंत्रणांचे कोणतेही नुकसान न होता अखेरीस ते चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील खोल विवरांच्या भागात चारही पायांवर तोल सांभाळून नीट उभे राहील, अशा पद्धतीने अलगद उतरविणे ही पुढील कामे थरारक आव्हानाची आहेत. पुढील तीन दिवस असेच यश मिळत गेले तर चंद्रावर यान अलगद उतरविण्याचे कौशल्य मिळविणारा अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतर भारत जगातील चौथा देश ठरेल.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो