शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अयोध्येत कोट्यवधींचा जमीन घोटाळा, विकासाच्या नावाखाली हेराफेरी;अखिलेश यादव यांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:27 IST

अयोध्येत मोठा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

अयोध्येतील जमिनी प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. बाहेरच्या लोकांनी अयोध्येत येऊन मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून हे सर्व नफा कमावण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही.  यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या मतदारसंघात समाजवादी पक्षाने ती जिंकली, यानंतर आता अखिलेश यादवअयोध्या मतदारसंघात लक्ष दिले आहे.

"पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला...", मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप

अखिलेश यादव म्हणाले, 'जसे अयोध्येतील जमिनीचे व्यवहार उघड होत आहेत, तसं सत्य समोर येत आहे की, भाजपच्या राजवटीत अयोध्येबाहेरील लोकांना नफा कमावण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. भाजप सरकारने गेल्या ७ वर्षांपासून सर्कल रेट न वाढवणे हे स्थानिक लोकांविरुद्धचे आर्थिक षडयंत्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे जमीन घोटाळे झाले आहेत. येथे जमीन भूमाफियांनी विकत घेतली आहे.

अखिलेश यादव म्हणाले, 'अयोध्या-फैजाबाद आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना या सगळ्याचा काहीच फायदा झाला नाही. गरीब आणि शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेणे हा एक प्रकारचा जमीन बळकावणे आहे. अयोध्येत तथाकथित विकासाच्या नावाखाली झालेल्या हेराफेरी आणि जमिनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, असंही यादव म्हणाले. 

अयोध्येतील जमिनीच्या किंमती झपाट्याने वाढल्या 

अयोध्येत राम मंदिरामुळे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक-खाजगी विकास पॅकेजमुळे जमिनीचे प्राइम रिअल इस्टेटमध्ये रूपांतर झाले आहे. अयोध्येतील जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून मार्च २०२४ पर्यंत जमीन रजिस्ट्रीची चौकशी करण्यात आली आहे. यामुळे अयोध्या आणि आसपासच्या गोंडा आणि बस्ती जिल्ह्यांतील किमान २५ गावांमध्ये जमिनीच्या व्यवहारांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. या जमिनी मंदिराच्या १५ किलोमीटरच्या परिघात येतात. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाAyodhyaअयोध्या