शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शंकर भगवान समजलो, पण नितीश कुमार भस्मासूर निघाले - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:10 IST

जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं 

पाटणा, दि. 27 - 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, सोबतच नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं. 

'बिहार एक जागरुक प्रदेश असून, आज गावागावातील लोक नाराज असल्याचं', लालूप्रसाद यादव बोलले आहेत. यावेळी बोलताना आज आपल्या देशात सर्वांना एकत्र आणण्यासाठी एकही गांधी नसल्याची खंत असल्याचंही लालूप्रसाद यादव बोलले आहेत. 'नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन, नोकरीचं अमिष दाखवून ढोंग केलं', असल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला. 

'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

यावेळी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांनी मातीत मिसळेन पण भाजपाशी हातमिळवणी करणार नसल्याचा दावा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. 'खोटी प्रतिमा उभी करुन नितीश कुमार यांचा पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रचार करण्यात आला. माझी इच्छा असती तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं नसतं', असं लालप्रसाद यादव यांनी सांगितलं. 

'अनेकदा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही मॅच फिक्स होती', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. 'अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्व मीडिया एकत्रित आला आहे. भारतात मात्र सगळी मीडिया विरोधकांशी लढत आहे.  मीडियामधील मोठ्या घराणांचा यात दोष आहे. अमित शहा जे ठरवतात तोच अजेंडा छापला जातो', असा आरोप त्यांनी केला.