शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शंकर भगवान समजलो, पण नितीश कुमार भस्मासूर निघाले - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:10 IST

जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं 

पाटणा, दि. 27 - 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, सोबतच नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं. 

'बिहार एक जागरुक प्रदेश असून, आज गावागावातील लोक नाराज असल्याचं', लालूप्रसाद यादव बोलले आहेत. यावेळी बोलताना आज आपल्या देशात सर्वांना एकत्र आणण्यासाठी एकही गांधी नसल्याची खंत असल्याचंही लालूप्रसाद यादव बोलले आहेत. 'नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन, नोकरीचं अमिष दाखवून ढोंग केलं', असल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला. 

'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

यावेळी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांनी मातीत मिसळेन पण भाजपाशी हातमिळवणी करणार नसल्याचा दावा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. 'खोटी प्रतिमा उभी करुन नितीश कुमार यांचा पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रचार करण्यात आला. माझी इच्छा असती तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं नसतं', असं लालप्रसाद यादव यांनी सांगितलं. 

'अनेकदा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही मॅच फिक्स होती', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. 'अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्व मीडिया एकत्रित आला आहे. भारतात मात्र सगळी मीडिया विरोधकांशी लढत आहे.  मीडियामधील मोठ्या घराणांचा यात दोष आहे. अमित शहा जे ठरवतात तोच अजेंडा छापला जातो', असा आरोप त्यांनी केला.