शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शंकर भगवान समजलो, पण नितीश कुमार भस्मासूर निघाले - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:10 IST

जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं 

पाटणा, दि. 27 - 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, सोबतच नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं. 

'बिहार एक जागरुक प्रदेश असून, आज गावागावातील लोक नाराज असल्याचं', लालूप्रसाद यादव बोलले आहेत. यावेळी बोलताना आज आपल्या देशात सर्वांना एकत्र आणण्यासाठी एकही गांधी नसल्याची खंत असल्याचंही लालूप्रसाद यादव बोलले आहेत. 'नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन, नोकरीचं अमिष दाखवून ढोंग केलं', असल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला. 

'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

यावेळी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांनी मातीत मिसळेन पण भाजपाशी हातमिळवणी करणार नसल्याचा दावा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. 'खोटी प्रतिमा उभी करुन नितीश कुमार यांचा पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रचार करण्यात आला. माझी इच्छा असती तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं नसतं', असं लालप्रसाद यादव यांनी सांगितलं. 

'अनेकदा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही मॅच फिक्स होती', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. 'अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्व मीडिया एकत्रित आला आहे. भारतात मात्र सगळी मीडिया विरोधकांशी लढत आहे.  मीडियामधील मोठ्या घराणांचा यात दोष आहे. अमित शहा जे ठरवतात तोच अजेंडा छापला जातो', असा आरोप त्यांनी केला.