शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शंकर भगवान समजलो, पण नितीश कुमार भस्मासूर निघाले - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:10 IST

जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं 

पाटणा, दि. 27 - 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, सोबतच नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं. 

'बिहार एक जागरुक प्रदेश असून, आज गावागावातील लोक नाराज असल्याचं', लालूप्रसाद यादव बोलले आहेत. यावेळी बोलताना आज आपल्या देशात सर्वांना एकत्र आणण्यासाठी एकही गांधी नसल्याची खंत असल्याचंही लालूप्रसाद यादव बोलले आहेत. 'नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन, नोकरीचं अमिष दाखवून ढोंग केलं', असल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला. 

'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

यावेळी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांनी मातीत मिसळेन पण भाजपाशी हातमिळवणी करणार नसल्याचा दावा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. 'खोटी प्रतिमा उभी करुन नितीश कुमार यांचा पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रचार करण्यात आला. माझी इच्छा असती तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं नसतं', असं लालप्रसाद यादव यांनी सांगितलं. 

'अनेकदा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही मॅच फिक्स होती', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. 'अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्व मीडिया एकत्रित आला आहे. भारतात मात्र सगळी मीडिया विरोधकांशी लढत आहे.  मीडियामधील मोठ्या घराणांचा यात दोष आहे. अमित शहा जे ठरवतात तोच अजेंडा छापला जातो', असा आरोप त्यांनी केला.