शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

लालू प्रसादांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, "इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:52 IST

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लालू प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला आहे. 

India Alliance Update: हरयाणा पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीत आता चलबिचल सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्याची मागणी केली. ममता बॅनर्जी यांनीही यासाठी तयारी दर्शवली. त्यात आता लालू प्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. लालू प्रसाद यादव यांचं विधान काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 

इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीपासून इंडिया आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. हरयाणात काँग्रेसने मित्रपक्षांना दूर ठेवले. तर महाराष्ट्रातही जबर झटका बसला. त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

लालू प्रसाद यादव काय म्हणाले?

"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून निवडले पाहिजे. काँग्रेसच्या विरोधाला अर्थ नाही. ममतांनाच नेता बनवलं गेलं पाहिजे", असे लालू प्रसाद यादव म्हणाले. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजद सत्तेत येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

तेजस्वी यादवही सकारात्मक 

ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याबद्दल राजदचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वी म्हटलेले आहे की, "तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडे नेतृत्व देण्याबद्दल आक्षेप नाही. पण, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हावा."

नेतृत्व करण्यास ममता बॅनर्जी तयार

काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे असे म्हटले आहे. 

ममता बॅनर्जींनी हरयाणा, महाराष्ट्रातील निकालाबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे. ते चालवत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी इतकंच म्हणेन की सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल."

पुढे ममता बॅनर्जी म्हणालेल्या की, "जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी नीट कशी काम करेल, हे निश्चित करेल. मला बंगालबाहेर जायची इच्छा नाहीये, पण मी इथूनच नेतृत्व करू शकते", असेही त्या म्हणालेल्या आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका