शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

लालू प्रसादांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, "इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:52 IST

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लालू प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला आहे. 

India Alliance Update: हरयाणा पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीत आता चलबिचल सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्याची मागणी केली. ममता बॅनर्जी यांनीही यासाठी तयारी दर्शवली. त्यात आता लालू प्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. लालू प्रसाद यादव यांचं विधान काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 

इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीपासून इंडिया आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. हरयाणात काँग्रेसने मित्रपक्षांना दूर ठेवले. तर महाराष्ट्रातही जबर झटका बसला. त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

लालू प्रसाद यादव काय म्हणाले?

"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून निवडले पाहिजे. काँग्रेसच्या विरोधाला अर्थ नाही. ममतांनाच नेता बनवलं गेलं पाहिजे", असे लालू प्रसाद यादव म्हणाले. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजद सत्तेत येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

तेजस्वी यादवही सकारात्मक 

ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याबद्दल राजदचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वी म्हटलेले आहे की, "तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडे नेतृत्व देण्याबद्दल आक्षेप नाही. पण, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हावा."

नेतृत्व करण्यास ममता बॅनर्जी तयार

काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे असे म्हटले आहे. 

ममता बॅनर्जींनी हरयाणा, महाराष्ट्रातील निकालाबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे. ते चालवत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी इतकंच म्हणेन की सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल."

पुढे ममता बॅनर्जी म्हणालेल्या की, "जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी नीट कशी काम करेल, हे निश्चित करेल. मला बंगालबाहेर जायची इच्छा नाहीये, पण मी इथूनच नेतृत्व करू शकते", असेही त्या म्हणालेल्या आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका