शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लालू प्रसाद यादव नैराश्याच्या गर्तेत; सतावतेय कुटुंबाची काळजी अन् मुलांमधली भाऊबंदकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 12:14 IST

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव डिप्रेशनमध्ये (नैराश्यात) गेले आहेत.

रांची : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव डिप्रेशनमध्ये (नैराश्यात) गेले आहेत. रांची येथील राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स  (RIMS) ने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. रिम्सचे डॉ. आर. के. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा आजारपण व वातावरणातील बदलांमुळे नैराश्य येऊ शकतं. 

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये लालू प्रसाद यादव यांच्या बिघडलेल्या प्रकृतीसाठी त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जबाबदार धरलं आहे. तसेच राजकारणातील घराणेशाहीवरून दोन्ही मुलांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे ते नैराश्यात असल्याचीही चर्चा सध्या रंगली आहे. एकंदरीत कुटुंबाची काळजी अन् मुलांमधली भाऊबंदकी यामुळे डिप्रेशन असल्याचं म्हटलं जातं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. 

डॉ. आर. के. श्रीवास्तव यांनी याआधीही लालू प्रसाद यादव नैराश्यात असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होती. पायावर सूज असल्याने चालताना त्यांना त्रास होत आहे. त्यातच डिप्रेशनची समस्याही पुढे आली आहे. उच्च रक्तदाबही आहे. मात्र, त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याची गरज नसल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं. 

लालू प्रसाद यादव हे रांचीमधील रिम्समध्ये उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी रिम्सच्या आसपास असणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आपल्याला झोप येत नाही अशी तक्रार त्यांनी केली होती. तसेच कुत्र्यांच्या भुंकण्याबरोबरच त्यांच्या खोलीतील बाथरूमची स्थिती अत्यंत वाईट असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

लालू प्रसाद यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत बिरसा मुंडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते. सध्या कारागृहाच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्याला उपचारासाठी जामीन वाढवून मिळावा अशी मागणी लालूप्रसाद यांनी 25 ऑगस्ट रोजी केली होती मात्र न्यायालयाने तो नामंजूर करत 30 ऑगस्ट रोजी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं आहे. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार