शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

"पुढच्या वेळी ते बिहारशी बालपणाचे नाते सांगतील"; मखाना खाण्यावरुन लालूंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मखानावरील विधानावरुन लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे.

Lalu Prasad Yadav Jibe On PM Narendra Modi: बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीला सात महिन्यांचा अवधी असताना तिथल्या राजकारणात हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या आमदारांना स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपण वर्षातील ३६५ दिवसांपैकी ते ३०० दिवस मखाना खात असल्याचे म्हटलं होतं. आता आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. पुढच्या वेळी पंतप्रधान मोदी ३५० दिवस बिहारी भुंजा खातील असं लालू प्रसाद यांनी म्हटलं.

बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी मखानाला सुपरफूड म्हटलं होतं. यावरुनच लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी आमच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी वर्षात फक्त ३०० दिवस मखना खाण्याबाबत सांगितले. पुढच्या वेळी ते ३५० दिवस ‘बिहारी भुंजा’ खाण्यावर आणि १०० दिवस भागलपुरी सिल्क घालण्यावर बोलतील असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट करत पंतप्रधान मोदीना टोला लगावला. "यावेळी आमच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी वर्षात फक्त ३०० दिवस मखना खाण्याबाबत सांगितले. पुढच्या वेळी ३५० दिवस “बिहारी भुंजा” खाण्यावर बोलतील. १०० दिवस भागलपुरी सिल्क घालतील. छठमैयाचा उपवास करतील. गंगेत स्नान करतील. जानकी मैय्याच्या मंदिरात जातील. बिहारशी बालपणाचे नाते जोडतील. मधुबनी चित्र काढलेले उपरणे किंवा कुर्ता घालतील. भोजपुरी, मगही, अंगिका, बज्जिका, सुरजापुरी आणि मैथिली भाषांमधून २-४ उधार घेतलेल्या ओळींनी भाषण सुरु करतील. जननायक कर्पूरी ठाकूर जी, लोकनायक जयप्रकाश जी आणि इतर महापुरुषांशी असलेल्या संबंधांबद्दल सांगतील," असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.

दरम्यान, बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर जिल्ह्यातून देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १९ वा हप्ता जारी केला होता. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात,"आज तुमचा मखाना देशातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मी देखील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस मखाना नक्कीच खातो. सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. आता बिहारच्या मखानाची वेळ आली आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार