शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये साध्या कैद्याप्रमाणे वागवतात, लालूंची न्यायाधीशांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 12:18 IST

एखाद्या राजकीय नेत्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कारागृहात शक्यतो त्याला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करत असतं, मात्र लालू प्रसाद यादव यांना अशी कोणतीच सुविधा मिळत नसल्याचं दिसत आहे.

रांची - एखाद्या राजकीय नेत्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कारागृहात शक्यतो त्याला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करत असतं, मात्र लालू प्रसाद यादव यांना अशी कोणतीच सुविधा मिळत नसल्याचं दिसत आहे. रांचीमधील कारागृहात बंद असलेल्या लालू प्रसाद यादव यांना एका साधारण कैद्याप्रमाणे राहावं लागत आहेत. स्वत: लालूप्रसाद यादव यांनी सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांकडे यासंबंधी तक्रार केली आहे. याआधी बुधवारी लालूंच्या दोन 'सेवाक-यांची' कारागृहातून सुटका करण्यात आली होती, जे खोट्या प्रकरणांसाठी कारागृहात बंद होते. 

बुधवारी लालू प्रसाद यादव यांना सुनावणीसाठी सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली असतानाही लालूंच्या चेह-यावर मात्र काहीच काळजी दिसत नव्हती. याउलट न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्यासोबत हसत खेळत चर्चा करताना ते दिसत होते. न्यायाधीश शिवपाल सिंह यांनीच लालू प्रसाद यादव यांना 89.27 लाखांच्या चारा घोटाळाप्रकरणी 6 जानेवारीला साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावला होता. 

न्यायालयात उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चर्चा सुरु असताना सर्वांच्या चेह-यावर हसू होतं. जेव्हा न्यायाधीश शिवपाल यांनी लालूंना कारागृहात काही समस्या आहेत का विचारलं तेव्हा त्यांना आपल्या शैलीत कारागृह प्रशासन त्यांना पक्ष कार्यकर्ता आणि इतरांना भेटणयाची परवानगी देत नसल्याचं सांगितलं. यावर न्यायाधीशांना कारागृहाच्या नियमांचं पालन केलं तर त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल असं सांगितलं. 

लालूंनी यावेळी आपल्याला साध्या कैद्याप्रमाणे वागवलं जात असल्याचीही तक्रार केली. यावर बोलताना न्यायाधीशांनी सर्वांसाठी नियम एकच असल्याचं सांगितलं. 

चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे. जामिनासाठी त्यांना आता झारखंड उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला. दोन्ही कायद्यांखालील शिक्षा एकदमच भोगायच्या असल्याने लालूंचा तुरुंगवास साडेतीन वर्षांचा असेल. याखेरीज प्रत्येक कायद्यान्वये पाच लाख याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांचा दंडही लालूंना झाला. दंड न भरल्यास आणखी सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवFodder scamचारा घोटाळा