शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जेलमध्ये साध्या कैद्याप्रमाणे वागवतात, लालूंची न्यायाधीशांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 12:18 IST

एखाद्या राजकीय नेत्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कारागृहात शक्यतो त्याला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करत असतं, मात्र लालू प्रसाद यादव यांना अशी कोणतीच सुविधा मिळत नसल्याचं दिसत आहे.

रांची - एखाद्या राजकीय नेत्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कारागृहात शक्यतो त्याला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करत असतं, मात्र लालू प्रसाद यादव यांना अशी कोणतीच सुविधा मिळत नसल्याचं दिसत आहे. रांचीमधील कारागृहात बंद असलेल्या लालू प्रसाद यादव यांना एका साधारण कैद्याप्रमाणे राहावं लागत आहेत. स्वत: लालूप्रसाद यादव यांनी सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांकडे यासंबंधी तक्रार केली आहे. याआधी बुधवारी लालूंच्या दोन 'सेवाक-यांची' कारागृहातून सुटका करण्यात आली होती, जे खोट्या प्रकरणांसाठी कारागृहात बंद होते. 

बुधवारी लालू प्रसाद यादव यांना सुनावणीसाठी सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली असतानाही लालूंच्या चेह-यावर मात्र काहीच काळजी दिसत नव्हती. याउलट न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्यासोबत हसत खेळत चर्चा करताना ते दिसत होते. न्यायाधीश शिवपाल सिंह यांनीच लालू प्रसाद यादव यांना 89.27 लाखांच्या चारा घोटाळाप्रकरणी 6 जानेवारीला साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावला होता. 

न्यायालयात उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चर्चा सुरु असताना सर्वांच्या चेह-यावर हसू होतं. जेव्हा न्यायाधीश शिवपाल यांनी लालूंना कारागृहात काही समस्या आहेत का विचारलं तेव्हा त्यांना आपल्या शैलीत कारागृह प्रशासन त्यांना पक्ष कार्यकर्ता आणि इतरांना भेटणयाची परवानगी देत नसल्याचं सांगितलं. यावर न्यायाधीशांना कारागृहाच्या नियमांचं पालन केलं तर त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल असं सांगितलं. 

लालूंनी यावेळी आपल्याला साध्या कैद्याप्रमाणे वागवलं जात असल्याचीही तक्रार केली. यावर बोलताना न्यायाधीशांनी सर्वांसाठी नियम एकच असल्याचं सांगितलं. 

चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे. जामिनासाठी त्यांना आता झारखंड उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला. दोन्ही कायद्यांखालील शिक्षा एकदमच भोगायच्या असल्याने लालूंचा तुरुंगवास साडेतीन वर्षांचा असेल. याखेरीज प्रत्येक कायद्यान्वये पाच लाख याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांचा दंडही लालूंना झाला. दंड न भरल्यास आणखी सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवFodder scamचारा घोटाळा