शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

किसान महापंचायतीसाठी लाखो शेतकरी दिल्लीला रवाना, संयुक्त किसान मोर्चाचा दावा; प्रलंबित मागण्या केंद्राने मान्य कराव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 06:03 IST

शेती उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीबाबत (एमएसपी) कायदा करावा या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याकरिता किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : येथील रामलीला मैदानात आज, सोमवारी (दि. २०) रोजी होणाऱ्या किसान महापंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे, असा दावा संयुक्त किसान मोर्चा या संघटनेने केला आहे. 

शेती उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीबाबत (एमएसपी) कायदा करावा या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याकरिता किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ९ डिसेंबर २०२१ रोजी दिलेली लेखी आश्वासने केंद्र सरकारने पूर्ण केली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या समोर अनेक समस्या असून, त्यांच्या निवारणासाठी सरकारने पावले उचलावीत. 

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सरकारविरोधात केलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, तसेच एमएसपीची गॅरंटी आदी प्रलंबित मागण्यांवर विचार केला जाईल असे केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी