शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

लाखो शेतकरी व कामगारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; राजधानीत वाहतुकीची प्रचंड कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:55 AM

जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील. आयुष्य वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे हाच उपाय आहे, असे उद्गार माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी बुधवारी दिल्लीत लाखो शेतकरी व कामगारांच्या मोर्चासमोर काढले.अ. भा. किसान महासभा, सिटू, अ.भा. शेतमजूर संघटना या डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकरी व कामगारांनी दिल्लीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रामलीला मैदानापासून सुरू झालेल्या विशाल मोर्चात तीन लाखांहून अधिक शेतकरी व कामगार घोषणा देत होते. विविध राज्यांतील शेतकरी व कामगारांबरोबर पूरग्रस्त केरळचे शेतकरीही त्यात होते. लाल सलाम, लाल झेंडे, लाल टोप्या, लाल शर्टस व लाल साड्यांनी सजलेल्या या मोर्च्यामुळे दिल्लीत लाल रंगाचे दर्शन सर्वांना घडले. मोर्च्यामुळे दिल्लीची वाहतूक पार विस्कळीत झाली होती.शेतकरी व कामगारांच्या हाती मागण्यांचे पत्रक होते. घोषणाही तशाच होत्या. महागाई रोखा, सर्वांना रेशनचे स्वस्त धान्य पुरवा, स्वामीनाथन शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव द्या, शेतकरी व शेतमजुरांचे कर्ज माफ करा, बेरोजगारांना रोजगार द्या. शहरांमधे रोजगार हमी लागू करा. दरमहा किमान १८ हजार वेतन द्या, बळजबरीने भू संपादन बंद करा अशा त्या मागण्या आहेत. सिटूच्या कॉम्रेड हेमलता, खा. तपन सेन, किसान सभेचे अशोक ढवळे, हन्नन मौला, शेतमजूर युनियनचे ए.विजय राघवन आदी नेत्यांचीही भाषणे झाली. मोदी सरकारने जाहिरातबाजीवर जितका खर्च केला, तितका शेतकºयांच्या कल्याणासाठी खर्च केला असता तर देशात अशी स्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका त्यांनी केली.नोव्हेंबरात राजधानीला घेराव घालणारअन्य वक्ते म्हणाले की, आमच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास लवकरच राजधानीत याहून मोठे आंदोलन केले जाईल. सर्व कामगार संघटनांची दिल्लीत संयुक्त परिषद २८ सप्टेंबर रोजी होईल. त्यानंतर, २८, २९, ३0 नोव्हेंबरला प्रत्येक राज्यातील लाखो शेतकरी व कामगार रस्त्यांवर उतरून दिल्लीला घेराव घालतील.

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली