शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

"शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र..."; लखीमपूर हिंसाचारावर निर्मला सीतारमन यांचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:15 IST

Lakhimpur Kheri Violence And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची (Ashish Mishra) 12 तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी यावर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे असं म्हटलं आहे. 

निर्मला सीतारमन यांनी "शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केलं पाहिजे" असं म्हटलं आहे. घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत असं सांगताना फक्त तिथे भाजपाचं सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेल तेव्हा नाही असं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. निर्मला सीतारमन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी विचारण्यात आलं.

"आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत"

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेत्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? तसंच कोणी अशा घटनांबद्दल प्रश्न विचारल्यानतंर बचावात्मक प्रतिक्रिया का दिली जाते? असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना त्यांनी "नाही…नक्कीच नाही. बरं झालं तुम्ही अशा एका घटनेचा उल्लेख केलात जी निषेधार्ह आहे. आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत आहे. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असून तो माझ्या काळजीचा विषय आहे" असं म्हटलं आहे. 

"संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल"

"भारतातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. माझी डॉक्टर अमर्त्य सेन यांच्यासह सर्वांना विनंती आहे की, जेव्हा कधी अशा घटना घडतील तेव्हा त्यांच्यावर भाष्य करुन मुद्दा मांडा. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडलं असेल तेव्हाच योग्य संधी म्हणून तो मांडला जाऊ नये. माझ्या कॅबिनेट सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे, आणि असे गृहीत धरू की प्रत्यक्षात त्यांनीच हे केले आहे आणि इतर कोणी नाही. पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल" असं निर्मला सीतारमन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार