शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लखीमपूर खेरी प्रकरण : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांवर कारवाई करा; प्रियांका, वरुण यांचे पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:49 IST

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे.

व्यंकटेश केसरी - 

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्रपणे पत्रे पाठवून केली आहे. 

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे.

मोदी हे डीजीपी परिषदेनिमित्त लखनौमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांबाबत खरोखरच संवेदनशील असाल, तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसू नका. तसेच त्यांना मंत्रीपदावरून काढून टाका. हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना मी भेटले आहे. तुम्ही मिश्रा यांच्यासोबत व्यासपीठावर बसलात, तर चुकीचा संदेश जाईल. 

वरुण गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वरिष्ठ पदावर बसलेल्या अनेक नेत्यांनी प्रक्षोभक भाषा वापरली. त्यामुळे शत्रुत्वाचे वातावरण तयार होऊन लखीमपूर खेरी येथे पाच शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, घटनेशी संबंध असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर कारवाई करण्यात यावी. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीVarun Gandhiवरूण गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार