शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लखीमपूर खेरी प्रकरण : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांवर कारवाई करा; प्रियांका, वरुण यांचे पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:49 IST

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे.

व्यंकटेश केसरी - 

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्रपणे पत्रे पाठवून केली आहे. 

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे.

मोदी हे डीजीपी परिषदेनिमित्त लखनौमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांबाबत खरोखरच संवेदनशील असाल, तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसू नका. तसेच त्यांना मंत्रीपदावरून काढून टाका. हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना मी भेटले आहे. तुम्ही मिश्रा यांच्यासोबत व्यासपीठावर बसलात, तर चुकीचा संदेश जाईल. 

वरुण गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वरिष्ठ पदावर बसलेल्या अनेक नेत्यांनी प्रक्षोभक भाषा वापरली. त्यामुळे शत्रुत्वाचे वातावरण तयार होऊन लखीमपूर खेरी येथे पाच शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, घटनेशी संबंध असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर कारवाई करण्यात यावी. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीVarun Gandhiवरूण गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार