शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लखीमपूर खेरी प्रकरण : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांवर कारवाई करा; प्रियांका, वरुण यांचे पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:49 IST

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे.

व्यंकटेश केसरी - 

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्रपणे पत्रे पाठवून केली आहे. 

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे.

मोदी हे डीजीपी परिषदेनिमित्त लखनौमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांबाबत खरोखरच संवेदनशील असाल, तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसू नका. तसेच त्यांना मंत्रीपदावरून काढून टाका. हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना मी भेटले आहे. तुम्ही मिश्रा यांच्यासोबत व्यासपीठावर बसलात, तर चुकीचा संदेश जाईल. 

वरुण गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वरिष्ठ पदावर बसलेल्या अनेक नेत्यांनी प्रक्षोभक भाषा वापरली. त्यामुळे शत्रुत्वाचे वातावरण तयार होऊन लखीमपूर खेरी येथे पाच शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, घटनेशी संबंध असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर कारवाई करण्यात यावी. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीVarun Gandhiवरूण गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार