शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पर्यायाअभावी अल्वा बनल्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार; ६ वर्षांपासून नव्हत्या काँग्रेस सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 06:21 IST

राज्यपाल राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांना काँग्रेसच्या सांगण्यावरून नव्हे तर, शरद पवार आणि सीताराम येचुरी यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून उमेदवार बनविण्यात आले आहे.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यपाल राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांना काँग्रेसच्या सांगण्यावरून नव्हे तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सीताराम येचुरी यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून विरोधकांच्या उमेदवार बनविण्यात आले आहे. २०१६ मध्ये आत्मकथन लिहिल्यानंतर अल्वा या काँग्रेसच्या बाहेर होत्या. काँग्रेस नेत्यांचे संबंध शस्त्रास्त्रांचे दलाल क्रिश्चियन आणि त्यांचे वडील वॉल्फगैंग मिशेल यांच्याशी असल्याचे आरोप अल्वा यांनी आत्मकथनातून केले होते. हे पिता-पुत्र अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यापासून ते अनेक संरक्षण व्यवहारात दलाल होते.

खरे तर विरोधकांकडे कोणताही सक्षम उमेदवार नव्हता. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार देऊ न शकणारा काँग्रेस पक्ष यंदा आपल्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या विचारात होता. मात्र, कोणीही तयार नव्हते. शरद पवार आणि येचुरी यासारख्या नेत्यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्या दक्षिण भारतीय आहेत. महिला आणि अल्पसंख्याक समुदायातील असल्याने अल्वा यांच्याबाबत कितीही विरोध असला तरी काँग्रेस पक्ष विरोध करू शकला नाही.

मार्गारेट अल्वा यांनी २००८च्या कर्नाटक निवडणुकीदरम्यान तिकिटांची विक्री केल्याचाही आरोप राज्य पार्टी शाखेवर केला होता. आपल्या आत्मकथनात त्यांनी दावा केला होता की, जानेवारी १९९२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना सोनिया गांधी यांच्या विरोधानंतरही राज्यसभेत पाठविले होते. सोनिया गांधी या आपले खासगी सचिव विन्सेंट जॉर्ज यांना राज्यसभेत पाठविण्यासाठी इच्छुक होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या जॉर्ज यांनी नरसिंहराव यांच्याविरुद्ध सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या.

अल्वा यांना दिली होती राज्यपाल पदाची जबाबदारी

२००४ मध्ये उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत अल्वा या राज्यसभेत पाठविण्यासाठी प्रतीक्षा करत होत्या. पण, सोनिया गांधी यांनी त्यांना केवळ पक्ष संघटनेत जबाबदारी दिली. २००९ मध्ये यूपीए सत्तेत परत आल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्याऐवजी राज्यपाल केले. त्या उत्तराखंड, राजस्थान, गोवा आणि गुजरातमध्ये २०१४ पर्यंत राज्यपाल होत्या. येथूनच त्यांच्या मनात काँग्रेसबाबत कटुता वाढली. त्यानंतर त्यांनी हा राग आपल्या आत्मकथनातून व्यक्त केला.

१९९५ मध्ये राव यांनी माधवराव शिंदे, कमलनाथ, अर्जुन सिंह, नारायण दत्त तिवारी, विद्याचरण शुक्ला आणि बुटा सिंग यांच्यासारख्या सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्यांविरुद्ध हवाला प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस