शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टेकीला आलेल्या कुमारस्वामी सरकारला चमत्कारच तारेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:25 IST

आघाडीच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारला गुरुवारी विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निदिव्यातून फक्त चमत्कारच वाचवू शकेल, अशी परिस्थिती कायम राहिली.

बंगळुरु/नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये गेले दोन आठवडे सुरू असलेल्या सत्तासंघर्ष नाट्याच्या तिढ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काहीच फरक न पडल्याने काँग्रेस-जद(एस) आघाडीच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारला गुरुवारी विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निदिव्यातून फक्त चमत्कारच वाचवू शकेल, अशी परिस्थिती कायम राहिली. सत्तेचे बुडते तारू वाचविण्यासाठी सत्ताधारी आघाडीने बंडखोर आमदारांवर अपात्रतेचा बडगा उगारण्याखेरीज इतरही अनेक क्लृप्त्या शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सत्तेच्या गणितात कोणताही फरक पडल्याचे दिसले नाही.१५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांवर सुयोग्य वेळी निर्णय घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्षांना दिली. त्याचबरोबर, मुंबईत ठाण मांडलेल्या या आमदारांना सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनास हजर राहण्याची सक्ती करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर, विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत बंडखोरांचे राजीनामे मंजूर वा नामंजूर करण्याचा कोणताच निर्णय घेतला नाही. बंडखोरांनी मात्र आम्ही राजीनाम्यांवर ठाम आहोत व काही झाले  तरी बंगळुरुला जाणार नाही, असे मुंबईत जाहीर केले. हे बंडखोर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सभागृहात न जाणे एवढेही कुमारस्वामी सरकार पडण्यास पुरेसे आहे. गुरुवारी मतदान होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र घोषित करणे किंवा त्याचे राजीनामे नामंजूर करणे असे कोणतेही निर्णय घेतले तरी यात फरक पडेल असे दिसत नाही.विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यासाठी कुमारस्वामी सरकारला सभागृहात हजर राहून प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या आमदारांपैकी निम्मयाहून एक जास्त एवढ्यांचा पाठिंबा मिळवावा लागेल.विधानसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असला तरी त्यांनी अगदी शेवटचा पर्याय म्हणून मतदान करणे अपेक्षित आहे. अध्यक्ष वगळून सभागृहाची सदस्यसंख्या २२४ आहे. त्यातून १६ बंडखोर वगळले तर ही संख्या २०८ वर येते.बंडखोरीमुळे सत्ताधारी आघाडीची सदस्यसंख्या १०० वर आली आहे. तर विरोधी भाजप व त्यांचे पाठीराखे दोन अपक्ष यांची १०७ ही संख्या कायम आहे.त्यामुळे याच पद्धतीने मतदान झाले तर विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाईल हे सहज कागदावर मांडता येणारे गणित आहे. म्हणूनच एखादा चमत्कारच सरकार वाचवू शकेल, अशी स्थिती आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण