शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामी राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात; मनात 'अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' बनल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:29 IST

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे.

बेंगळुरु : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये अस्थिर राजकारणाचे वारे वाहू लागले होते. बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. कमी जागा असूनही कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यांना राजकीय नाट्यामुळे मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. 

या सर्व घडामोडींनंतर सत्ता गेल्यावर कुमारस्वामींनी पहिल्यांदाच मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी राजकारणात अपघातानेच आलो होतो. तसेच मुख्यमंत्रीही अपघातानेच बनलो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी तिथे कोणाला खूश करण्यासाठी बसलो नव्हतो. राज्याच्या विकासासाठी मी गेले 14 महिने चांगले काम केले आहे. मी समाधानी असल्याचे सांगत त्यांनी मनात चाललेली खळबळही व्यक्त केली आहे. 

मी आजचे राजकारण कोणत्या थराला, दिशेला जात आहे हे पाहिले आहे. राजकारण हे श्रेत्र चांगल्या लोकांसाठी नाही. ते जातीयवादी आहे. मी ठरवले आहे. मला शांततेत जगायचे आहे. राजकारण माझ्या कुटुंबाला नकोसे झाले आहे. मला लोकांच्या हृदयात जागा हवी आहे. माझे ठरलेय मला राजकारणात राहायचे नाही. राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. 

 

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार असल्याने बहुमतासाठी 113 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, सभागृहातील आज उपस्थित आमदारांचा विचार केल्यास, काँग्रेसच्या बाजुने 95 आणि विरोधात 105 मतदान झालं आहे. त्यामुळे, कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे. 

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. आज दिवसभरात काँग्रेसचे दोन आमदार गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर 15 आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 20 महिन्यांनंतर कर्नाटकमधील सरकार कोसळले. या घटनेनंतर काय होऊ शकते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र बहुमत असल्याने भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलावले जाईल. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक