शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

कुमारस्वामी राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात; मनात 'अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' बनल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:29 IST

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे.

बेंगळुरु : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये अस्थिर राजकारणाचे वारे वाहू लागले होते. बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. कमी जागा असूनही कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यांना राजकीय नाट्यामुळे मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. 

या सर्व घडामोडींनंतर सत्ता गेल्यावर कुमारस्वामींनी पहिल्यांदाच मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी राजकारणात अपघातानेच आलो होतो. तसेच मुख्यमंत्रीही अपघातानेच बनलो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी तिथे कोणाला खूश करण्यासाठी बसलो नव्हतो. राज्याच्या विकासासाठी मी गेले 14 महिने चांगले काम केले आहे. मी समाधानी असल्याचे सांगत त्यांनी मनात चाललेली खळबळही व्यक्त केली आहे. 

मी आजचे राजकारण कोणत्या थराला, दिशेला जात आहे हे पाहिले आहे. राजकारण हे श्रेत्र चांगल्या लोकांसाठी नाही. ते जातीयवादी आहे. मी ठरवले आहे. मला शांततेत जगायचे आहे. राजकारण माझ्या कुटुंबाला नकोसे झाले आहे. मला लोकांच्या हृदयात जागा हवी आहे. माझे ठरलेय मला राजकारणात राहायचे नाही. राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. 

 

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार असल्याने बहुमतासाठी 113 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, सभागृहातील आज उपस्थित आमदारांचा विचार केल्यास, काँग्रेसच्या बाजुने 95 आणि विरोधात 105 मतदान झालं आहे. त्यामुळे, कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे. 

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. आज दिवसभरात काँग्रेसचे दोन आमदार गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर 15 आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 20 महिन्यांनंतर कर्नाटकमधील सरकार कोसळले. या घटनेनंतर काय होऊ शकते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र बहुमत असल्याने भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलावले जाईल. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक