शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

'कुमार विश्वास यांनी सरकार पाडण्याचा कट रचल्यानं राज्यसभेवर पाठवलं नाही', आपचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 11:10 IST

राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतरही आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतरही आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय. आम आदमी पार्टीनं पहिल्यांदा जाहिररित्या कुमार विश्वास यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही, असा गंभीर आरोप आदमी पार्टीनं केला आहे. 

राज्यसभेमध्ये बाहेरील दोन उमेदवारांना का पाठवण्यात आले?, यावर आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाळ राय यांनी पार्टीतील कार्यकर्त्यांना फेसबुक लाइव्हदरम्यान स्पष्टीकरण दिले. 

नेमकं काय म्हणाले गोपाळ राय?जो आम आदमी पार्टीचं सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडण्याच्या षड्यंत्रात सहभागी असेल, जो जाहिररित्या प्रत्येक व्यासपीठाहून पार्टीविरोधात विधानं करत असेल, त्या व्यक्तीला राज्यसभेवर कसं पाठवलं जाऊ शकतं?  ती व्यक्ती पार्टीचा आवाज होईल कि पार्टीला संपवण्यासाठी काम करेल? अशा व्यक्तीला राज्यसभेवर पाठवायला हवं? मला असं वाटतं की अजिबात पाठवलं जाऊ नये. यासाठी पार्टीनं हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही कुमार विश्वास यांच्यावर सरकार पाडण्याचं षड्यंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दिल्ली महापालिका निवडणुकीदरम्यान आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी विश्वास यांना भाजपाचे एजंट म्हणत केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर नाराज झालेल्या कुमार विश्वास यांची मनधरणी करण्यात आली होती. यानंतर केजरीवाल यांनी कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवलं होतं.  

याच पार्श्वभूमीवर गोपाळ राय यांनी आरोप केले आहेत की, ज्या पद्धतीनं दिल्लीतील आप सरकारल पाडण्याचं संपूर्ण षड्यंत्री रचण्यात आले, त्याचं केंद्र कुमार विश्वास होते. या षड्यंत्रासंदर्भात सर्वाधिक बैठका कुमार विश्वास यांच्या निवासस्थानीच होत होत्या, असा गौप्यस्फोटही राय यांनी केला आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल