शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी राज्यपालांना स्नेहभोजनाला बोलावले अन्...गेटच बंद करून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:10 IST

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. यामुळे तेथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भोजनाचे निमंत्रण देऊन ऐनवेळी रद्द करत विधानसभेची दारेच बंद केल्याने राज्यपालांवर धरणे आंदोलनाला बसण्याची वेळ आली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या. तसेच केंद्रीय तपास संस्थांची राज्यातील कारवाईची परवानगीच त्यांनी काढून घेतली होती. तर लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहांच्या रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप झाला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर आज वेगळाच मानापमानाचा ड्रामा समोर आला आहे. 

झाले असे की विधानसभा अध्यक्षांनी राज्यपाल जगदीप धनखड़ यांना गुरुवारी विधानसभेमध्ये स्नेहभोजनासाठी बोलावले होते. मात्र, ऐनवेळीच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. जेव्हा राज्यपाल विधानसभेत जाण्यासाठी आले तेव्हा त्यांना गेट बंद दिसले. यामुळे त्यांनी दुसऱ्या गेटने विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गेटवर त्यांना काही काळ उघडण्याची वाटही पहावी लागली. नंतर पहिल्या गेटनेच ते आत गेले. 

हा अपमान पाहून नाराज झालेल्या राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये अशी लोकशाही चालणार नाही. हा माझा अपमान आहे. राज्यात अनेकदा माझा अपमान करण्यात आला आहे आणि हा एक कट आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता लगावला. तसेच विधानसभेचे गेट बंद असल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

राज्यपालांनी विधानसभेत पोहोचल्यावर सांगितले की, जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा महनीय व्यक्तींसाठीच्या गेटवर आलो तेव्हा गेट बंद दिसले. मला इथे या ऐतिहासिक इमारतीला पहायचे होते. लायब्ररीला भेट द्यायची होती. विधानसभा स्थिगित केली याचा अर्थ असा नाही की सभागृहही बंद करावे. पूर्ण सचिवालय सुरू असायला हवे होते. 

खरे राजकारण राज्यपालांच्या पत्रावरून सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यानी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पत्र लिहिले की, मी उद्या विधानसभेतील सुविधांची पाहणी करण्यासाठी येत आहे. तसेच लायब्ररीमध्येही जाणार आहे. त्याच्या आधीच म्हणजे मंगळवारी राज्यपालांनी तृणमूल काँग्रेसला टोला लगावताना म्हटले होते की, मी संविधानाचे पालन करतोय याचा अर्थ रबर स्टँम्प नाही. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल