शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
6
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
7
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
8
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
9
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
10
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
12
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
13
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
14
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
15
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
16
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
17
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
18
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
19
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
20
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?

पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी राज्यपालांना स्नेहभोजनाला बोलावले अन्...गेटच बंद करून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:10 IST

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. यामुळे तेथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भोजनाचे निमंत्रण देऊन ऐनवेळी रद्द करत विधानसभेची दारेच बंद केल्याने राज्यपालांवर धरणे आंदोलनाला बसण्याची वेळ आली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या. तसेच केंद्रीय तपास संस्थांची राज्यातील कारवाईची परवानगीच त्यांनी काढून घेतली होती. तर लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहांच्या रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप झाला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर आज वेगळाच मानापमानाचा ड्रामा समोर आला आहे. 

झाले असे की विधानसभा अध्यक्षांनी राज्यपाल जगदीप धनखड़ यांना गुरुवारी विधानसभेमध्ये स्नेहभोजनासाठी बोलावले होते. मात्र, ऐनवेळीच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. जेव्हा राज्यपाल विधानसभेत जाण्यासाठी आले तेव्हा त्यांना गेट बंद दिसले. यामुळे त्यांनी दुसऱ्या गेटने विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गेटवर त्यांना काही काळ उघडण्याची वाटही पहावी लागली. नंतर पहिल्या गेटनेच ते आत गेले. 

हा अपमान पाहून नाराज झालेल्या राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये अशी लोकशाही चालणार नाही. हा माझा अपमान आहे. राज्यात अनेकदा माझा अपमान करण्यात आला आहे आणि हा एक कट आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता लगावला. तसेच विधानसभेचे गेट बंद असल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

राज्यपालांनी विधानसभेत पोहोचल्यावर सांगितले की, जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा महनीय व्यक्तींसाठीच्या गेटवर आलो तेव्हा गेट बंद दिसले. मला इथे या ऐतिहासिक इमारतीला पहायचे होते. लायब्ररीला भेट द्यायची होती. विधानसभा स्थिगित केली याचा अर्थ असा नाही की सभागृहही बंद करावे. पूर्ण सचिवालय सुरू असायला हवे होते. 

खरे राजकारण राज्यपालांच्या पत्रावरून सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यानी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पत्र लिहिले की, मी उद्या विधानसभेतील सुविधांची पाहणी करण्यासाठी येत आहे. तसेच लायब्ररीमध्येही जाणार आहे. त्याच्या आधीच म्हणजे मंगळवारी राज्यपालांनी तृणमूल काँग्रेसला टोला लगावताना म्हटले होते की, मी संविधानाचे पालन करतोय याचा अर्थ रबर स्टँम्प नाही. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल