शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या पोटावर वार केले, कोणीच किंकाळ्या ऐकल्या नाहीत?; कोलकाता प्रकरणावर संतापल्या स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 19:46 IST

BJP Smriti Irani : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटलं.

Kolkata Rape-Murder Case: पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांसह सामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. पश्चिम बंगालमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे.

कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तिथे अशी व्यक्ती कोण होती जिच्यामुळे बलात्कारानंतर तो घरी परत येऊ शकतो असा विश्वास बलात्कार करणाऱ्याला होता? मुलीने आत्महत्या केल्याचे पालकांना सांगणाऱ्या पोलिसातील ती व्यक्ती कोण आहे, त्या अधिकाऱ्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली?, असे सवाल स्मृती इराणी यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत, असेही स्मृती इराणी यांनी म्हटलं.

"मुख्यमंत्री ममता यांनी 'माझा बलात्कार-माझा बलात्कार'चे राजकारण थांबवावे. राज्यातील राजकारण पाहून भारतातील जनता मुलीवरील बलात्काराविरुद्ध आवाज उठवणार का? राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्या स्वतःच्या विरोधात आंदोलन करत होत्या? लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणे बंद करा. बलात्कारी बेफिकीर आहेत, पण जमाव येऊन आंदोलकांवर हल्ला करतो. गुंडांची फौज जमते आणि पोलिसांना त्याची माहिती नसते. ते पुराव्याचा भाग असलेल्या गोष्टी नष्ट करतात," असे स्मृती इराणी म्हणाल्या.

"एकच व्यक्ती त्या महिलेवर बलात्कार करत असेल, तिचे पाय तोडत असेल, तिचे हात तोडत असेल, तिचे डोळे काढत असेल, तिच्या छातीवर, पोटावर वार करत असेल आणि ती स्त्री ती ओरडत असेल आणि तिचा आवाज कोणी ऐकला नसेल? हे संपूर्ण कृत्य एकाच बलात्काऱ्याने केले? तो कोण आहे ज्याच्यामुळे बलात्कारानंतर घरी जाऊ शकतो असे बलात्कार करणाऱ्याला वाटलं असेल? एवढा गुन्हा घडूनही हॉस्पिटलच्या त्याच मजल्यावर नूतनीकरण सुरू ठेवणारी व्यक्ती कोण? महिलेच्या पालकांना फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली?," असे प्रश्नही स्मृती इराणी यावेळी उपस्थित केले.

"यावरून स्पष्टपणे दिसून येते की महिलेवर बलात्कार होत असताना तिचा छळ होत होता. न्यायाच्या शोधात असलेल्या बंगालच्या प्रत्येक नागरिकासोबत संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. एका मुलीवर तिच्याच रुग्णालयात बलात्कार होतो. असे अनेक प्रश्न आहेत, जनता उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. कुटुंबाने पैसे नाही तर न्याय मागितला आहे. कुटुंबाला न्याय मिळवून देणे हीच सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल," असेही स्मृती इराणी म्हणाल्या. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSmriti Iraniस्मृती इराणीMamata Banerjeeममता बॅनर्जीCrime Newsगुन्हेगारी