शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

"बंगालमध्ये गुंड, अराजकता..."; कोलकाता प्रकरणावरून भाजपा नेत्याने ममता बॅनर्जींना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:50 IST

व्हीडी शर्मा यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टर हत्येच्या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्व अभियानाच्या संदर्भात मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा गुरुवारी सीहोर येथे पोहोचले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित केलं. याच दरम्यान व्हीडी शर्मा यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

व्हीडी शर्मा म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये गुंड आणि अराजकता सुरू आहे. आंदोलन केल्यावर टीएमसीचे गुंड गोळीबार करतात. पश्चिम बंगालमधील घटनेने राष्ट्रपतीही दुखावल्या आहेत. असं असतानाही विरोधक खोटं, फसवेगिरीचं राजकारण करत आहेत. पण देशातील जनतेला ते आता चांगलंच समजलं आहे."

भाजपच्या सदस्यत्व मोहिमेबाबत व्हीडी शर्मा म्हणाले की, राज्यात दीड कोटी सदस्य बनवण्याचं आमचं लक्ष्य आहे. संपूर्ण देशात जास्तीत जास्त सदस्य घेऊन प्रथम येण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण, विकास आणि लोककल्याणकारी धोरणांचा आज देशातील प्रत्येक सामाजिक वर्गावर परिणाम झाला आहे. 

31 ऑगस्ट रोजी बूथवर आयोजित केलेल्या कार्यशाळेत भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रणनीती बनवून घरोघरी संपर्क साधून जास्तीत जास्त सदस्य बनवावेत. भाजपाची सर्वात मोठी ताकद बूथ कार्यकर्ते आणि बूथ कमिटी आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यापूर्वी अहमदाबादमधील एका बूथचे अध्यक्ष राहिले आहेत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर किमान २०० सभासद करून जिल्ह्याने साध्य केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक सभासद करून राज्यात इतिहास घडवावा असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाdoctorडॉक्टर