शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:10 IST

Air India Flight Cancelled History: मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाने तांत्रिक कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

Air India Flight Cancelled History: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. परंतु, यानंतरही एअर इंडियाचा गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत तांत्रिकसह अन्य कारणांमुळे एअर इंडियाला शेकडो विमाने रद्द करावी लागली आहेत.

अहमदाबाद अपघातानंतर बोईंग ड्रीमलायनरबाबत एअर इंडियाने सावध पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाची तब्बल ७ विमाने रद्द करण्यात आली. तांत्रिक गोंधळाबरोबरच खराब हवामानाचाही फटका एअर इंडियाच्या सेवेला बसला आहे. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना रद्द करण्यात आले. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. तसेच अमृतसरहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमानही एअर इंडियाने रद्द केले. एकाच दिवसांत एअर इंडियाची सात उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलायनरशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. 

‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच

मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यसभेत सरकारने दिलेल्या उत्तरात २०२२ ते २०२४ पर्यंतच्या वेगवेगळ्या उड्डाणे रद्द केल्याची आकडेवारी देण्यात आली होती. या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२२ मध्ये एअर इंडियाच्या ८७ हजार १९१ पैकी १२२ उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. सन २०२३ मध्ये १ लाख ०५ हजार ९९९ पैकी १८१ उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली होती. २०२४ मध्ये एअर इंडियाच्या कामगिरीत काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. एकूण १ लाख १० हजार ३५१ उड्डाणांपैकी १०७ उड्डाणे त्या वर्षांत तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, आताच्या घडीला एअर इंडियाच्या विदेशातून भारतात येणाऱ्या विमान सेवेवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या वतीने विमाने रद्द होत असल्याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाCentral Governmentकेंद्र सरकारRajya Sabhaराज्यसभा