शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:10 IST

Air India Flight Cancelled History: मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाने तांत्रिक कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

Air India Flight Cancelled History: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. परंतु, यानंतरही एअर इंडियाचा गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत तांत्रिकसह अन्य कारणांमुळे एअर इंडियाला शेकडो विमाने रद्द करावी लागली आहेत.

अहमदाबाद अपघातानंतर बोईंग ड्रीमलायनरबाबत एअर इंडियाने सावध पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाची तब्बल ७ विमाने रद्द करण्यात आली. तांत्रिक गोंधळाबरोबरच खराब हवामानाचाही फटका एअर इंडियाच्या सेवेला बसला आहे. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना रद्द करण्यात आले. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. तसेच अमृतसरहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमानही एअर इंडियाने रद्द केले. एकाच दिवसांत एअर इंडियाची सात उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलायनरशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. 

‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच

मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यसभेत सरकारने दिलेल्या उत्तरात २०२२ ते २०२४ पर्यंतच्या वेगवेगळ्या उड्डाणे रद्द केल्याची आकडेवारी देण्यात आली होती. या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२२ मध्ये एअर इंडियाच्या ८७ हजार १९१ पैकी १२२ उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. सन २०२३ मध्ये १ लाख ०५ हजार ९९९ पैकी १८१ उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली होती. २०२४ मध्ये एअर इंडियाच्या कामगिरीत काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. एकूण १ लाख १० हजार ३५१ उड्डाणांपैकी १०७ उड्डाणे त्या वर्षांत तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, आताच्या घडीला एअर इंडियाच्या विदेशातून भारतात येणाऱ्या विमान सेवेवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या वतीने विमाने रद्द होत असल्याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाCentral Governmentकेंद्र सरकारRajya Sabhaराज्यसभा