शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जाणून घ्या भारताच्या घातक INS किल्तान युद्धनौकेबद्दल, चीन-पाकिस्तानच्या पाणबुडयांचा वेध घेण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:17 IST

भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच आयएनएस किल्तान दाखल होणार आहे. या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकत कैकपटीने वाढणार आहे.

ठळक मुद्देभारतात वेगवेगळया राज्यांमध्ये अत्याधुनिक युद्धनौका बांधण्याचे काम सुरु आहे.  भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांकडून सर्वाधिक समुद्री धोका आहे.

नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच आयएनएस किल्तान दाखल होणार आहे. या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकत कैकपटीने वाढणार आहे. खास पाणबुडी विरोधी तंत्रज्ञान आयएनएस किल्तानचे वैशिष्टय आहे. शिवालिक, कोलकत्ता क्लास वर्गातील युद्धनौकानंतर आयएनएस किल्तान ही भारतातच विकसित करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे. 

- आयएनएस किल्तान हेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, 76 एमएम कॅलिबर मिडियम रेंज गन, दोन 30 एमएम  मल्टी बॅरल गन्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि मिसाईल सिस्टमने सुसज्ज आहे तसेच किल्तान युद्धनौकेवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणा-या रेवती या दोन रडार यंत्रण बसवण्यात आल्या आहेत.

- कार्बन फायबरचा वापर करुन बांधण्यात आलेली ही भारतातील पहिली युद्धनौका आहे. कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते. 

- लक्षद्विपमध्ये किल्तान नावाचे बेट आहे. त्यावरुन या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे. दिल्लीपासून हे बेट 1,947 किलोमीटर अंतरावर आहे. 

-  भारतीय नौदलाच्या एका विभागाने आयएनएस किल्तानचे डिझाईन तयार केले. कोलकात्यातील गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने ही युद्धनौका बांधली आहे. 

युध्दनौका बांधणीच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. भारतात वेगवेगळया राज्यांमध्ये अत्याधुनिक युद्धनौका बांधण्याचे काम सुरु आहे.  मुख्य म्हणजे या युद्धनौकांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अनेक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यातही दाखल झाल्या आहेत. भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांकडून सर्वाधिक समुद्री धोका आहे. भारतीय नौदलापुढे मुख्य आव्हान चीनचे आहे. चीननेही आपल्या नौदलाच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई शहरावर 2008 सालच्या नोव्हेंबर महिन्यात दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत घुसले होते. त्यामुळे समुद्र सुरक्षेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलwar shipयुद्ध नौका