शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:08 IST

यापूर्वीही अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

नवी दिल्ली- तिनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर (टीकरी, सिंघू, शाहजहांपूर आणि गाजीपूर) बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुढील आठवड्यात 8 महिने होतील. यातच, उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. (kisan Andolan Bollywood director Ashok Pandit furious on rakesh tikaits statement and said the country has not worn bangles)

"शेतकरी तर परत येणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. 5 सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. देशात लढाई होईल, असे वाटते, की युद्ध होणार," असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

टिकैतांच्या याच वक्तव्यावर, फिल्‍ममेकर आणि इंडियन फिल्‍म अँड टीवी डायरेक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित (Ashoke Pandit) भडकले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की 'खलिस्तान्यांच्या आणि पाकिस्तानच्या पैशांनी देशाविरोधात युद्ध करण्याची यांची इच्छा आहे! देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत टिकैत जी!" 

यापूर्वीही अशोक पंडित यांनी अनेक वेळा ट्विट करत राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तेव्ह, आपण आंदोलन स्थळावरच कोरोना लस घेणार, असे टिकैत म्हणाले होते. एवढेच नाही, तर येथील प्रत्येक आंदोलकाला कोरोना लस टोचावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर अशोक पंडित यांनी ट्विट करत, हा काही 'हलवा' नाही, असे म्हटले होते.

...तर आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील - तत्पूर्वी, कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड