शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:08 IST

यापूर्वीही अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

नवी दिल्ली- तिनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर (टीकरी, सिंघू, शाहजहांपूर आणि गाजीपूर) बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुढील आठवड्यात 8 महिने होतील. यातच, उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. (kisan Andolan Bollywood director Ashok Pandit furious on rakesh tikaits statement and said the country has not worn bangles)

"शेतकरी तर परत येणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. 5 सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. देशात लढाई होईल, असे वाटते, की युद्ध होणार," असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

टिकैतांच्या याच वक्तव्यावर, फिल्‍ममेकर आणि इंडियन फिल्‍म अँड टीवी डायरेक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित (Ashoke Pandit) भडकले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की 'खलिस्तान्यांच्या आणि पाकिस्तानच्या पैशांनी देशाविरोधात युद्ध करण्याची यांची इच्छा आहे! देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत टिकैत जी!" 

यापूर्वीही अशोक पंडित यांनी अनेक वेळा ट्विट करत राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तेव्ह, आपण आंदोलन स्थळावरच कोरोना लस घेणार, असे टिकैत म्हणाले होते. एवढेच नाही, तर येथील प्रत्येक आंदोलकाला कोरोना लस टोचावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर अशोक पंडित यांनी ट्विट करत, हा काही 'हलवा' नाही, असे म्हटले होते.

...तर आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील - तत्पूर्वी, कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड