शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

तुम्ही मर्यादेत राहा, आम्ही अतिक्रमण करणार नाही; किरेन रिजिजू यांचा न्यायपालिकेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 06:42 IST

आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. सध्या कोणीही न्यायाधीशांना प्रश्न विचारू शकत नाही, असे केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:केंद्र सरकार आपल्या मर्यादांचे उल्लंघन करणार नाही आणि राज्याच्या अधिकार क्षेत्रावरही अतिक्रमण करणार नाही. तथापि, न्यायपालिकेने देखील त्याचे पालन करणे अपेक्षित आहे, असे मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.   

‘भारतीय न्याय व्यवस्थेसमोरील नवीन आव्हाने आणि संधी’ या विषयावर अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या १६ व्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्य घटनेने ठरवून दिलेल्या मर्यादेचे कोणतेही उल्लंघन केल्याने प्रसारमाध्यमांना मसालासह बातम्या प्रसारित करण्याची संधी मिळते.  न्यायाधीश लोकांद्वारे निवडले जात नसले तरी त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे की, ते जनतेला देखील उत्तरदायी आहेत. आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. सध्या कोणीही न्यायाधीशांना प्रश्न विचारू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

लहान वकिलांनाही संधी द्या...

काही मोठे वकील असे आहेत जे सर्व मोठ्या केसेस घेतात आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवितात. काही वकील तर कोर्टातील एका सुनावणीचे ३० ते ४० लाख आकारतात. या लोकांनी पूर्ण जागेवर कब्जा करू नये. लहान वकिलांनाही संधी द्यायला हवी. ते म्हणाले की, न्याय मिळण्यासाठी उशीर होऊ नये. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. काही वकील तर तारखाच मागत असतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Courtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार