शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या; पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 10:22 IST

देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणं गरजेचे आहे.

नवी दिल्ली- देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. 25 जून 1975 रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीवर ट्विट करताना लिहिलं आहे की, देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणं गरजेचे आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात संसदेत आणीबाणीवर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा काही भागही दाखविण्यात आला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, 1975 मध्ये आजच्याच दिवशी आपल्याला राजकीय फायद्यासाठी देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. देशातील नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेतले होते. वृत्तपत्रांवर टाळे लावले होते. लाखो देशभक्तांना देशात पुन्हा लोकशाही आणण्यासाठी नरकयातना सहन कराव्या लागल्या होत्या. त्या सर्वांना मी नमन करतो असं शहांनी लिहिलं आहे. 

तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा भारताच्या इतिहासातील सर्वांत गंभीर घटनांमधील एक घटना आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या संस्था आणि संविधानाला अखंड ठेवण्यासाठी अशा घटनांना आठवणीत ठेवणे गरजेचे आहे. 

संरक्षण मंत्र्यासोबत अनेक मंत्र्यांनी यावर ट्विट केलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मी माझा वेळ देशाच्या स्वतंत्र्यासाठी समर्पित करतो. कारण 25 जून 1975 च्या रात्री भारतात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी लोकशाहीची हत्या झाली. रिजिजू यांनी ट्विटमध्ये त्यावेळच्या वृत्तपत्राचं छायाचित्र पोस्ट केलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधी