शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Video : 'मध्यान्ह भोजनात अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 10:00 IST

मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह  भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

ठळक मुद्देगोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं.भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह  भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकारच्या या प्रस्तावावर भाजपाची अनेक नेतेमंडळी टीका करत आहेत. भाजपाचे नेते गोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं आहे.

भार्गव यांनी भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील असं अजब विधान केलं आहे. 'एका कुपोषित सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? मुलांना अंडी खाण्यासाठी दिली जातील. मात्र जी मुलं अंडी खाणार नाहीत त्यांना जबरदस्तीने ते खायला सांगणार. मुलं कुपोषित राहिली तर त्यांना चिकन, मटण देखील भरवलं जाईल. भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील 'असं भार्गव यांनी म्हटलं आहे. 

मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी कुपोषणाशी लढण्यासाठी नोव्हेंबरपासून मध्यान्ह भोजनात अंड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अंगणवाडीतील मुलांना आणि गर्भवती महिलांना अंडी देण्यात येणार आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून भाजपाचे नेते गोपाल भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांथा राव यांनी दिले्या माहितीनुसार भार्गव यांनी केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर त्याची नोंद घेत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 30 सप्टेंबरच्या रात्री गुन्हा दाखल झाला होता. मध्यप्रदेश विधानसभेत भार्गव हे विरोधी पक्षनेते आहेत. ही पोटनिवडणूक काही सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील नसून ती पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लढाई आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भार्गव यांनी केला होता. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा