शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'मध्यान्ह भोजनात अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 10:00 IST

मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह  भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

ठळक मुद्देगोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं.भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह  भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकारच्या या प्रस्तावावर भाजपाची अनेक नेतेमंडळी टीका करत आहेत. भाजपाचे नेते गोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं आहे.

भार्गव यांनी भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील असं अजब विधान केलं आहे. 'एका कुपोषित सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? मुलांना अंडी खाण्यासाठी दिली जातील. मात्र जी मुलं अंडी खाणार नाहीत त्यांना जबरदस्तीने ते खायला सांगणार. मुलं कुपोषित राहिली तर त्यांना चिकन, मटण देखील भरवलं जाईल. भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील 'असं भार्गव यांनी म्हटलं आहे. 

मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी कुपोषणाशी लढण्यासाठी नोव्हेंबरपासून मध्यान्ह भोजनात अंड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अंगणवाडीतील मुलांना आणि गर्भवती महिलांना अंडी देण्यात येणार आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून भाजपाचे नेते गोपाल भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांथा राव यांनी दिले्या माहितीनुसार भार्गव यांनी केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर त्याची नोंद घेत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 30 सप्टेंबरच्या रात्री गुन्हा दाखल झाला होता. मध्यप्रदेश विधानसभेत भार्गव हे विरोधी पक्षनेते आहेत. ही पोटनिवडणूक काही सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील नसून ती पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लढाई आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भार्गव यांनी केला होता. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा