शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 09:14 IST

लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु...

नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी 'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं,  सांभाळ आम्ही करू'' असे अजब वक्तव्य केलं आहे. देशातील लोकसंख्येवर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर टिका होतायत. सरस्वती महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना आरोप केला आहे की, लोकशाहीचा वापर करत काही लोक आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूकडून संपुर्ण जग हिसकावण्यात आले आहे आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे. परिस्थिती लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध निर्माण होईल असेही ते म्हणाले आहेत. 

स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी एखादा कठोर कायदा करत नाही तोपर्यंत  हिंदूंना तोपर्यंत आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. किमान चार ते पाच मुले प्रत्येक हिंदूने जन्माला घातली पाहिजे. आपण ऐवढी मुले सांभाळू शकत नाही असे म्हणणा-यांनी मुले जन्माला घालून आम्हा संन्याशांकडे सोपवावीत, त्यांचा आम्ही सांभाळ करु. त्यांच्यासाठी आम्ही गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचे शिक्षणही पुर्ण करु. असे वक्तव्य नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी केलं आहे.