शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम गेला वाया दुबार पेरणीचीही शक्यता मावळली: ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी, बाजारपेठेतील उलाढाल मंदावली

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

शहाजी फुरडे-पाटील

शहाजी फुरडे-पाटील
बार्शी :
पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी बार्शी तालुक्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यातच जमा आहे़ याचा बाजारपेठेवरही परिणाम जाणवत आहे.
यंदा कांदलगाव, देवगाव, धसपिंपळगाव, मळेगाव, कारी, नारी, जामगाव, पिंपरी, सावरगाव या भागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यातच काही शेतकर्‍यांनी सोयाबीन, तूर, कापूस, उडिद, मूग यांच्या पेरण्या उरकून घेतल्या़ तालुक्यात २0-२५ गावांत अशी पेरणी झाली आहे. मात्र उर्वरित तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे पेरणीच झाली नाही़ पाऊस पडेल, या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकर्‍यांची पिके जळून जात असून, अर्धा अधिक पावसाळ्याचा काळ गेल्याने दुबार पेरणीचीही शक्यता मावळली आहे. खरिपाची पिके ही शेतकर्‍यांसाठी पैसे मिळवून देणारी असतात. होते तेवढे पैसे खरिपावर खर्च केल्याने आता रब्बीसाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
कांद्याच्या रोपासाठीही पाणी नाही
बहुतांश शेतकर्‍यांनी पाऊस पडेल, या आशेवर विहीर व बोअरला असलेल्या पाण्याच्या भरवशावर कांद्याची रोपे तयार केली. मात्र पाऊस नसल्याने पाणीही उपलब्ध नाही. ही रोपे उगवूनदेखील आली. मात्र विहिरीत रोपांना देण्याएवढे किंवा जनावरांना पिण्याएवढे पाणी नसल्यामुळे या रोपांची जोपासना करणे अवघड झाले आहे़
सर्व प्रकल्प कोरडे
बार्शी तालुक्यातील सर्व लघु, मध्यम प्रकल्प दोन महिन्यांपूर्वीच पूर्णपणे कोरडे पडले आहेत़ केवळ हिंगणी धरणात थोडेसे पाणी आहे़ ढाळेपिंपळगावचे पाणीदेखील तळाला गेले असून त्याठिकाणी देखील केवळ गाळच राहिला आहे़
बार्शीत पीकविमाही नाही
बार्शी तालुका हा मराठवाड्याच्या सीमेवरील तालुका आहे. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणेच बार्शीतही पाऊस पडतो. दोन्हीकडील पीक परिस्थितीही सारखीच आहे़ मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पाच कोटी रुपयांच्या जवळपास पीक विमा भरला आहे़ मात्र शेजारच्या भूम, परंडा, कळंब या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला. मात्र बार्शी तालुक्यात केवळ किरकोळ पेरणी झालेल्या मुगाला विमा मंजूर झाला आहे़
कोट
जुलैअखेरपर्यंत पाऊस पडला असता तर खरिपाच्या हंगामातील तूर व सोयाबीनची उशिरा पेरणी करता आली असती. मात्र पाऊसच न पडल्यामुळे आता खरीप हंगामातील पिकांची पेरणी करणे अवघड झाले आहे़ ज्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांची पिकेदेखील पाण्याअभावी करपू लागली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच सर्वजणच अडचणीत आले आहेत़
-राजेंद्र चौधरी
तालुका कृषी अधिकारी