शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"हसीनांची जबाबदारी घेतली आता शत्रूला मदत केली तर..."; खलेदा झियांच्या पक्षाचा भारताला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:23 IST

खलेदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने शेख हसीना यांना  भारताने आश्रय दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे

Bangladesh EX PM Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतली आहेत. दुसरीकडे, हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी आल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सोमवारी (५ ऑगस्ट) बांगलादेशमधून पलायन केले आणि त्या भारतात आल्या आहेत. हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला असला तरी अद्याप ब्रिटनने त्यांना त्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शेख हसीना या आणखी काही काळ भारतातच राहणार असण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, शेख हसीना यांच्या कट्टर विरोधक असलेल्या खलेदा झिया यांच्या पक्षाने भारताला इशारा दिला आहे.

खलेदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने शेख हसीना यांना  भारताने आश्रय दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने भारताने पदच्युत शेख हसीना यांना दिलेल्या आश्रयाला विरोध केला. खलेदा झिया यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते आणि बांगलादेशचे माजी मंत्री गायेश्वर रॉय यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तुमच्या पक्षात भारतविरोधी भावना आहेत का सवाल रॉय यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना रॉय यांनी बांगलादेश आणि भारत यांनी परस्पर सहकार्य केले पाहिजे, असं म्हटलं. तसेच भारत सरकारला परस्पर सहकार्याच्या भावनेनुसार वागावे लागेल असेही रॉय यांनी म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रॉय यांनी शेख हसीना यांच्या भारतातील उपस्थितीबाबत भाष्य केलं. "बांग्लादेश आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचे बीएनपी पक्ष समर्थन करतो. तुम्ही जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत केली तर दोघांमधील परस्पर सहकार्याचा सन्मान करणे कठीण होईल. आआमच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी येथे सांगितले होते की, भारत शेख हसीनाला पुन्हा सत्तेत आणण्यास मदत करेल. शेख हसीना यांची जबाबदारी भारत उचलत आहे. भारतीय आणि बांगलादेशी लोकांना एकमेकांशी कोणतीही अडचण नाही. पण भारताने संपूर्ण देशापेक्षा एकाच पक्षाला (अवाली लीग) उचलून धरणे योग्य आहे का?,  असा सवाही रॉय यांनी केला. 

यावेळी रॉय यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवरील होत असलेल्या हल्ल्यांबद्दलही त्यांनी भाष्य केलं. बांगलादेशातील विविध समुदायांचे लोक बीएनपी बनवतात आणि आमचा पक्ष हा सर्व समुदायांच्या वैयक्तिक हक्कांवर विश्वास ठेवतो," असे गायेश्वर रॉय म्हणाले.

ढाकासह देशाच्या अनेक भागात अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यवसायांची तोडफोड करण्यात आली आहे. लोकप्रिय लोक बँड गानचा प्रमुख गायक राहुल आनंदा याच्या निवासस्थानीही तोडफोड आणि नासधूस केली आहे. त्यामुळे गायक राहुल आनंदा आणि त्याचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत.

भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी घटक बांगलादेशचा वापर करत असल्याच्या आरोपांवरही रॉय यांनी भाष्य केलं. भारताने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत केली आहे. आम्ही भारताच्या विरोधात असू शकत नाही," असे रॉय यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत