शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:21 IST

Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाने ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वायनाडमध्ये अजूनही मदतकार्य सुरू आहे. बचाव पथक मातीच्या ढिगाऱ्याखाली असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  देशभरातून या घटनेवरुन चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता वेगवेगळी माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वायनाड मधील भूस्खलन झालेल्या घटनेसारखीच एक लघुकथा एका लहान मुलीने लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीने लिहिलेली कथा एका मॅगझिनमध्ये छापुनही आली होती. ही लहान मुलगी इयत्ता आठवीत शिकते. तिने लिहिलेली कथा आता खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे. 

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!

नेमकं प्रकरण काय?

या मुलीचे नाव लाया असं आहे. ती इयत्ता आठवीत शिकते. गेल्या वर्षी तिने शाळेत एका लघुकथा लिहिली होती, तिने ही कथा तिच्या एवढ्याच मुलीची लिहिली होती. लायाची ही कथा गेल्या वर्षी स्कूल मॅगझिनमध्येही प्रसिद्ध झाली होती. लायाने लिहिलेली कथा धबधब्यात बुडणाऱ्या मुलीची होती. तिचा बुडून मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर ती पक्ष्याच्या रूपाने गावात परतते. लायाच्या कथेत पक्षी गावातील मुलांना म्हणते, 'मुलांनो, या गावातून पळून जा. इथे मोठा धोका होणार आहे.' यानंतर मुलं गाव सोडून पळू लागतात. त्यांनी मागे वळून पाहिले तर डोंगरावरुन जोरात पावसाचे पाणी वाहते. कथेत यानंतर पक्ष्याचे रूपांतर एका सुंदर मुलीत होते, आणि काही क्षणातच ती गायबही होते.

वायनाडमधील चुरमला भूस्खलनाच्या विळख्यात बुडाले आहे. लायाच्या कथेपेक्षा वेगळे, येथील वातावरण अतिशय वेदनादायक आहे. लायाने तिचे वडील लेनिन यांनाही गमावले आहे. लायाच्या शाळेतील ४९७ विद्यार्थ्यांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे वडील आणि भावंडही गमावले आहेत. शाळेचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शाळेच्या मैदानाचे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडमध्येही पावसामुळे मोठं नुकसान

दिल्लीसह देशातील अनेक शहरांत पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूनने देशातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. काल (३१ जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल आणि केरळच्या वायनाडमध्येही भूस्खलन झालं आहे. 

टॅग्स :wayanad-pcवायनाडmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस