शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:21 IST

Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाने ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वायनाडमध्ये अजूनही मदतकार्य सुरू आहे. बचाव पथक मातीच्या ढिगाऱ्याखाली असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  देशभरातून या घटनेवरुन चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता वेगवेगळी माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वायनाड मधील भूस्खलन झालेल्या घटनेसारखीच एक लघुकथा एका लहान मुलीने लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीने लिहिलेली कथा एका मॅगझिनमध्ये छापुनही आली होती. ही लहान मुलगी इयत्ता आठवीत शिकते. तिने लिहिलेली कथा आता खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे. 

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!

नेमकं प्रकरण काय?

या मुलीचे नाव लाया असं आहे. ती इयत्ता आठवीत शिकते. गेल्या वर्षी तिने शाळेत एका लघुकथा लिहिली होती, तिने ही कथा तिच्या एवढ्याच मुलीची लिहिली होती. लायाची ही कथा गेल्या वर्षी स्कूल मॅगझिनमध्येही प्रसिद्ध झाली होती. लायाने लिहिलेली कथा धबधब्यात बुडणाऱ्या मुलीची होती. तिचा बुडून मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर ती पक्ष्याच्या रूपाने गावात परतते. लायाच्या कथेत पक्षी गावातील मुलांना म्हणते, 'मुलांनो, या गावातून पळून जा. इथे मोठा धोका होणार आहे.' यानंतर मुलं गाव सोडून पळू लागतात. त्यांनी मागे वळून पाहिले तर डोंगरावरुन जोरात पावसाचे पाणी वाहते. कथेत यानंतर पक्ष्याचे रूपांतर एका सुंदर मुलीत होते, आणि काही क्षणातच ती गायबही होते.

वायनाडमधील चुरमला भूस्खलनाच्या विळख्यात बुडाले आहे. लायाच्या कथेपेक्षा वेगळे, येथील वातावरण अतिशय वेदनादायक आहे. लायाने तिचे वडील लेनिन यांनाही गमावले आहे. लायाच्या शाळेतील ४९७ विद्यार्थ्यांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे वडील आणि भावंडही गमावले आहेत. शाळेचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शाळेच्या मैदानाचे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडमध्येही पावसामुळे मोठं नुकसान

दिल्लीसह देशातील अनेक शहरांत पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूनने देशातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. काल (३१ जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल आणि केरळच्या वायनाडमध्येही भूस्खलन झालं आहे. 

टॅग्स :wayanad-pcवायनाडmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस