शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 02:19 IST

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागातील शिबिरातील स्थलांतरित लोक आता घरी परतू लागले आहेत. तथापि, भूस्खलन आणि पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यात अनेक मृतदेह आढळून आले आहेत. राज्यातील मृतांची संख्या शनिवारी ११३ वर पोहोचली आहे.

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना झाल्या होत्या. या ठिकाणी आता सर्च आॅपरेशन सुरू आहे. हैदराबादेतील एक विशेष टीम कवलप्परा येथे जीपीआरसह दाखल होत आहे. या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दडलेल्या मृतदेहांचा शोध लावता येणार आहे. मलप्पुरममध्ये २१, वायनाडमध्ये ७ आणि कोट्टायममध्ये १ जण बेपत्ता आहे. पाऊस आणि पुरामुळे १२,७६१ घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ११८६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ८०५ शिबिरात १,२९,५१७ लोक राहत आहेत.हिमाचलमध्ये ६ लोकांना वाचविलेसिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाने कहर केला असून, पालमपूरमध्ये पुरामुळे फसलेल्या ६ जणांना वाचविण्यात आले आहे. कांगडामध्ये सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत, तर कांगडा आणि चम्बा जिल्ह्यात भूस्खलनानंतर अनेक रस्ते अद्याप बंद आहेत. आगामी दोन दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे.मध्यप्रदेशात पावसाचे आतापर्यंत ७० बळीभोपाळ : पश्चिमी मध्यप्रदेशच्या काही भागांत सततच्या पावसाने पूर कायम आहे. पूर आणि संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्याच्या इतर भागांत शुक्रवारपासून पाऊस कमी झाला आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिव जी. व्ही. रश्मी यांनी सांगितले की, ७० पैकी १५ जणांचा मृत्यू वीज कोसळून झाला आहे.येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंदिरा सागरसह सहा मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ११७ लोकांना वाचविण्यात आले आहे. पुरामुळे ४२९८ लोक विस्थापित झाले आहेत, तर २३६८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.कोलकात्यात मुसळधार पावसाचा इशाराकोलकाता : पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत वीज कोसळून किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.राजस्थानात जनजीवन विस्कळीतजयपूर : राजस्थानात गत काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त कोटा आणि आजूबाजूच्या भागांत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये शुक्रवार ते शनिवारी सकाळपर्यंत १३७ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर