शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 02:19 IST

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागातील शिबिरातील स्थलांतरित लोक आता घरी परतू लागले आहेत. तथापि, भूस्खलन आणि पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यात अनेक मृतदेह आढळून आले आहेत. राज्यातील मृतांची संख्या शनिवारी ११३ वर पोहोचली आहे.

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना झाल्या होत्या. या ठिकाणी आता सर्च आॅपरेशन सुरू आहे. हैदराबादेतील एक विशेष टीम कवलप्परा येथे जीपीआरसह दाखल होत आहे. या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दडलेल्या मृतदेहांचा शोध लावता येणार आहे. मलप्पुरममध्ये २१, वायनाडमध्ये ७ आणि कोट्टायममध्ये १ जण बेपत्ता आहे. पाऊस आणि पुरामुळे १२,७६१ घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ११८६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ८०५ शिबिरात १,२९,५१७ लोक राहत आहेत.हिमाचलमध्ये ६ लोकांना वाचविलेसिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाने कहर केला असून, पालमपूरमध्ये पुरामुळे फसलेल्या ६ जणांना वाचविण्यात आले आहे. कांगडामध्ये सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत, तर कांगडा आणि चम्बा जिल्ह्यात भूस्खलनानंतर अनेक रस्ते अद्याप बंद आहेत. आगामी दोन दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे.मध्यप्रदेशात पावसाचे आतापर्यंत ७० बळीभोपाळ : पश्चिमी मध्यप्रदेशच्या काही भागांत सततच्या पावसाने पूर कायम आहे. पूर आणि संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्याच्या इतर भागांत शुक्रवारपासून पाऊस कमी झाला आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिव जी. व्ही. रश्मी यांनी सांगितले की, ७० पैकी १५ जणांचा मृत्यू वीज कोसळून झाला आहे.येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंदिरा सागरसह सहा मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ११७ लोकांना वाचविण्यात आले आहे. पुरामुळे ४२९८ लोक विस्थापित झाले आहेत, तर २३६८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.कोलकात्यात मुसळधार पावसाचा इशाराकोलकाता : पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत वीज कोसळून किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.राजस्थानात जनजीवन विस्कळीतजयपूर : राजस्थानात गत काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त कोटा आणि आजूबाजूच्या भागांत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये शुक्रवार ते शनिवारी सकाळपर्यंत १३७ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर