शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 10:28 IST

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या उपायांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सणासुदीच्या महिन्यांत कठोरपणे पालन करून घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना गुरुवारी दिले. कोविड-१९ ची दुसरी लाट अजून विरलेली नाही आणि प्रत्येक सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसले आहे, असे केंद्राने म्हटले.देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळचा ओणम महोत्सवानंतरचा वाटा हा ५८.४ टक्के आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत १० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. एवढेच काय महाराष्ट्रातही रुग्णसंख्या घटली असून तेथे उपचाराधीन रुग्ण १६ टक्के, कर्नाटकमध्ये ५.५८, तमिळनाडूत ५.५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४.२१ टक्के आहेत.  देशात गुरुवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ४६,१६४ नोंदली गेली. त्यात केरळचा वाटा मोठा आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला. कोणत्याही परिस्थितीत सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जास्तीची काळजी घ्या, उपाय योजा, अशा शब्दांत केंद्र सरकारने राज्यांना सावध केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशी उपाययोजना केली आहे का, असे विचारल्यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे.”

बहुसंख्य भारतीयांना लसींनंतर दुष्परिणाम नाहीत : पाहणीचा निष्कर्षn    देशात ६० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस दिली गेली असून त्यातील बहुसंख्य जणांना त्यानंतर कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) जाणवला नाही किंवा जाणवला असेल तर तो अगदी सौम्य होता. n    यावर्षी १६ जानेवारीपासून देशभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांच्या अनुभवांची पाहणी करून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. n    सौम्य दुष्परिणाम जाणवले ते कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा टोचून घेतल्यानंतरच्या २४-४८ तासांत आणि फक्त एक टक्का लोकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर कोविड-१९ ची बाधा झाली. या तक्रारी होत्या थकवा, हात दुखणे आणि ताप येण्याच्या. कोव्हॅक्सिन लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ३० टक्के जणांना ताप आला तर एक टक्के लोकांना तापाशिवाय गंभीर तक्रार होती.

n    ही पाहणी ‘लोकल सर्कल्स’ या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केली. त्यात कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ७० टक्के जणांना आणि कोविशिल्डची दुसरीही मात्रा घेतलेल्यांपैकी ७५ टक्के जणांना कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.n    कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ६४ टक्के जणांना आणि याच लसीची दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी ७८ टक्के जणांना अजिबात दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्या