शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अरेरे! 25 कोटींची लॉटरी लागताच आनंदाने नाचला अन् आता प्रचंड वैतागला; जाणून घ्या, नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 10:24 IST

रातोरात कोट्याधीश झालेला, तब्बल 25 कोटींची लॉटरी जिंकलेला व्यक्ती दु:खी झाला आहे.

लॉटरी लागल्यावर सर्वच जण खूप खूश होतात. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. पण या अगदी उलट एक घटना आता समोर आली आहे. रातोरात कोट्याधीश झालेला, तब्बल 25 कोटींची लॉटरी जिंकलेला व्यक्ती दु:खी झाला आहे. केरळचे अनूप. बी य़ांनी दोन महिन्यांपूर्वी एक सरकारी लॉटरी जिंकली होती. लॉटरी जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे अनूप सध्या खूप त्रासल्याची माहिती मिळत आहेत.

लॉटरी लागल्यानंतर अनूप यांच्या आयुष्यात असे काही बदल झाले की त्यांनी कधी याचा विचारही केला नव्हता. घरातून बाहेर पडल्यानंतर लोकांचं लक्ष फक्त त्यांच्याकडेच असतं. अनेक मित्र आणि नातेवाईक नाराज आहेत, असं अनूप यांनी सांगितलं. दिवसभरात अनूप यांना अनेक जण भेटतात. त्यातील खूप लोक पैशांची मागणी करतात. अनूप यांनी सप्टेंबर 2022 मध्ये लॉटरी जिंकली. देशातील सर्वात मोठी सरकारी लॉटरी जिंकल्याने नशीब फळफळलं. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तिरुवनंतपूरम येथे राहणाऱ्या अनूप हे गेल्या कित्येक वर्षांपासून लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. याआधी त्यांनी लहानसहान रकमेची लॉटरी जिंकली आहे. अनूप 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकले. तेव्हापासून अनुप यांचं आयुष्य बदललं. लॉटरी जिंकल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलला. त्यांचं वागणं बदललं. लॉटरी लागल्यावर शेकडो लोक भेटायला आले. सकाळी झोपेतून उठून घराबाहेर पडायचो, तर मोठी रांग लागलेली असायची. 

पहाटे पाचपासून लोक भेटायला यायचे. त्यांना आर्थिक मदत हवी असायची, असं अनूप यांनी सांगितलं. लॉटरी जिंकल्यानंतर अनूप यांच्याशी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्यांची मुलाखत घेतली. जिंकलेल्या पैशातून लोकांची मदत करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. त्यानंतर अनूप यांच्या घराजवळ गर्दी झाली. एक व्यक्ती तर रॉयल एनफिल्ड घेऊन द्या अशी मागणी करत दिवसभर घरात ठाण मांडून होता, अशी माहिती अनूप यांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Keralaकेरळ