शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

केरळ सरकार देणार 'गिफ्ट'; आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याला मिळणार 'सुरक्षित घर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 15:36 IST

धर्माची चौकट ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्याला केरळ सरकार नव्या पद्धतीने सुरक्षा उपलब्ध करून देणार आहे. सरकारच्या या नवीन योजनेचे नाव सुरक्षित घर असं ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - केरळ सरकारने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या अडचणी कमी करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या योजनेचे नाव 'सुरक्षित घर' असं आहे. या अंतर्गत आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याला राहण्यासाठी एक वर्षासाठी घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

प्रेम जडल्यानंतरही भविष्यातील संकटांना घाबरून अनेकजन धर्माच्या चौकट ओलांडण्यासाठी धजावत नाही. मात्र केरळ सरकारने अशा जोडप्यांचे संकट काही प्रमाणात कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. केरळच्या आरोग्य आणि सामाजिक न्यायमंत्री के.के. शैलजा यांनी या योजनेची माहिती विधानसभेत दिली. या योजनेला विधानसभेत मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. ही योजना सुरू करण्यासाठी आवश्यक हालचाली सुरू झाल्या असून यासाठी सरकारने अनेक एनजीओशी करार केल्याचे शैलजा यांनी सांगितले.

दरम्यान केरळ सरकारने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याच्या आर्थिक बाजुचाही विचार केला आहे. अनुसुचित जाती आणि जमाती मधील पुरुष आणि महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा कमी असणाऱ्या जोडप्याला उद्योगासाठी सरकारडून 30 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच जोडप्यापैकी एकजन अनुसूचित जातीतील असेल तर ते जोडपे 75 हजार रुपयांपर्यंतच्या मदतीसाठी पात्र ठरेल.

आंतरधर्मीय विवाहातील जोडप्यापैकी एक व्यक्ती सरकारी नौकरीत असेल तर त्याच्या बदलीसाठी विशेष काळजी घेण्यात येईल. मात्र नोकरीत आरक्षण देण्यासंदर्भात काही तरतूद नसल्याचे शैलजा यांनी सांगितले.