शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

केरळ सरकार देणार 'गिफ्ट'; आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याला मिळणार 'सुरक्षित घर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 15:36 IST

धर्माची चौकट ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्याला केरळ सरकार नव्या पद्धतीने सुरक्षा उपलब्ध करून देणार आहे. सरकारच्या या नवीन योजनेचे नाव सुरक्षित घर असं ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - केरळ सरकारने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या अडचणी कमी करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या योजनेचे नाव 'सुरक्षित घर' असं आहे. या अंतर्गत आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याला राहण्यासाठी एक वर्षासाठी घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

प्रेम जडल्यानंतरही भविष्यातील संकटांना घाबरून अनेकजन धर्माच्या चौकट ओलांडण्यासाठी धजावत नाही. मात्र केरळ सरकारने अशा जोडप्यांचे संकट काही प्रमाणात कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. केरळच्या आरोग्य आणि सामाजिक न्यायमंत्री के.के. शैलजा यांनी या योजनेची माहिती विधानसभेत दिली. या योजनेला विधानसभेत मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. ही योजना सुरू करण्यासाठी आवश्यक हालचाली सुरू झाल्या असून यासाठी सरकारने अनेक एनजीओशी करार केल्याचे शैलजा यांनी सांगितले.

दरम्यान केरळ सरकारने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याच्या आर्थिक बाजुचाही विचार केला आहे. अनुसुचित जाती आणि जमाती मधील पुरुष आणि महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा कमी असणाऱ्या जोडप्याला उद्योगासाठी सरकारडून 30 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच जोडप्यापैकी एकजन अनुसूचित जातीतील असेल तर ते जोडपे 75 हजार रुपयांपर्यंतच्या मदतीसाठी पात्र ठरेल.

आंतरधर्मीय विवाहातील जोडप्यापैकी एक व्यक्ती सरकारी नौकरीत असेल तर त्याच्या बदलीसाठी विशेष काळजी घेण्यात येईल. मात्र नोकरीत आरक्षण देण्यासंदर्भात काही तरतूद नसल्याचे शैलजा यांनी सांगितले.