शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

Kerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:42 IST

Kerala Floods: केंद्राकडे केली मागणी; नैसर्गिक आपत्तीवर चर्चा करण्यास विधानसभेचे खास अधिवेशन

तिरुवनंतपुरम : मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी सोसावी लागलेल्या केरळने या स्थितीतून सावरण्यासाठी केंद्राकडे २६०० कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत मागितली आहे. याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला. मनरेगा या रोजगार योजनेसह केंद्राच्या विविध योजनांच्या अंतर्गत राज्याला ही मदत देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. केरळ विधानसभेचे एक दिवसाचे खास अधिवेशन ३० आॅगस्ट रोजी होणार असून त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात उद््भवलेल्या गंभीर स्थितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.राज्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुराचे पाणी ओसरु लागले आहे. विस्थापित लोक घरी परतू लागले आहेत. केरळमध्ये पाऊस व पुरामुळे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य दोन मंत्र्यांनी मिळून या राज्याला हंगामी ६८० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कृषीकर्जाच्या परतफेडीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचे बँकांनी ठरविले आहे.कर्जाच्या मर्यादेत वाढ करानैसर्गिक आपत्तीने झालेल्या हानीमुळे राज्यातील १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती व अन्य पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घ्यावी लागणार असून त्यासाठी कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणीही केरळ सरकारने केंद्राकडे केली आहे. सध्या राज्याच्या सकल उत्पन्नाच्या ३ टक्के इतकेच कर्ज घेण्याची मुभा आहे ती ४.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला पुनर्बांधणीच्या कामांसाठी खुल्या बाजारातून साडेदहा हजार कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेणे शक्य होईल.बकरी इद, ओनमवर पाणी२५ आॅगस्ट येत असलेला ओनम हा महत्त्वाचा सण साजरा करण्याच्या मन:स्थितीत केरळमधील जनता नाही. या सणानिमित्त आयोजिलेले कार्यक्रम रद्द करून ते पैसे मदतनिधीसाठी देण्यात येणार आहेत. बुधवारी बकरी इद हा सणही फारशा उत्साहाने साजरी होईल अशी चिन्हे नाहीत.डॉक्टर, नर्सेसची गरजकेरळमध्ये आता लाखो लोकांच्या उद््ध्वस्त झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार ही मंडळी लागणार आहेतच पण रोगराई फैलावू नये यासाठी उपाययोजना करण्याकरिता मोठ्या संख्येने डॉक्टर, नर्सेस यांची सेवाभावी मदत राज्याला हवी आहे असे केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी म्हटले आहे.विमानतळाचे नुकसानकोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचे २२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. धावपट्टीवरच पाणी शिरल्याने हा विमानतळ २७ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.मदतीचा ओघ सुरुचदेशभरातील रेल्वेच्या कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार, मारुती सुझुकीच्या कर्मचाºयांनी ३.५ कोटी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले आहे. आयटीसी, कोका कोला, हिंदुस्थान लिव्हर आदी १२ कंपन्यांनी पिण्याचे पाणी, अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी कोची बंदरात देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. या वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोची पोर्ट ट्रस्टने दोन गोदामे उपलब्ध करुन दिली आहेत.यूएई देणार ७०० कोटींची मदतसंयुक्त अरब अमिरातीने (यूएई) केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेग अल नह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन ही माहिती दिली. यूएईमध्ये केरळमधील हजारो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांच्यामुळे विकासाला जी चालना मिळाली त्याचे स्मरण ठेवून यूएईने नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केरळला मदतीचा हात पुढे केला आहे.पाच दिवसांत १.६३ लाख नागरिकांची सुखरूप सुटका१०.७८ लाख लोक विस्थापित झाले असून त्यामध्ये २.१२ लाख महिला, १२ वर्षांखालील १ लाख मुलांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांत पुरात अडकलेल्या १.६३ लाख नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदी