शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Kerala Floods:पुरामुळे कोची विमानतळाचे 250 कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:01 IST

अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

तिरुवनंतपूरम- केरळमधील पुरामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे राज्यात विविध सेवा बंद पडल्या असून आर्थिक नुकसानही फार झाले आहे. कोची विमानतळाचे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पुराचे पाणी धावपट्टीवर आल्यामुळे 15 ऑगस्टपासून हा विमानतळ बंद आहे. 26 ऑगस्टरोजी विमानतळ पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. कोची एअरपोर्ट केरळमधील सर्वात जास्त वाहतूक होणारा विमानतळ आहे. येथे आखाती देशांमधून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात. सध्या 250 लोक या विमानतळाची दुरुस्ती करण्याच्या कामासाठी प्रयत्न करत आहेत.अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.कोची विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवले जाणारे जगातील एकमेव विमानतळ होते. पुरामुळे सोलर पॅनल्सचेही नुकसान झाले आहे. या पुरामुळे 20 टक्के पॅनल्स खराब झाले आहेत. केवळ सोलर पॅनल्सच नव्हे तर वीज साठवण्याचे केंद्राचेही नुकसान झाले आहे. सोलर पॅनल्ससाठी 10 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विमनतळाचा विमा उतरवला असल्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून 250 कोटी रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळAirportविमानतळ