शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 11:20 IST

मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र...

कोच्ची - मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत केली नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी केरळमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केरळमधील पुराबाबत केंद्राने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. "केंद्र सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत करणे आवश्यक होते. हे केरळच्या लोकांचे ऋण आहे. हा त्यांचा हक्क आहे. मात्र केंद्र सरकारने जेवढी करणे आवश्यक असते तेवढी मदत केली नाही, याचे मला दु:ख आहे,"असे राहुल गांधी म्हणाले. तसेच मी येथे केरळच्या जनतेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. मी काल केरळमधील अनेक मदत केंद्रांना भेट दिली. तेथे राहत असलेले लोक पुनर्वसनाबाबत चिंतीत आहेत. मी केरळण्याच मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा केली. या घडीला पुरात नुकसान झालेल्या घरांचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन सरकारने देणे आवश्यक आहे. तसेच नुकसान भरपाई देण्याच्या आश्वासनाची पूर्तताही लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपावरही जोरदार टीका केली. "भारतात दोन व्हिजन आहेत. एक केंद्रीकृत व्हिजन आणि दुसरा विकेंद्रित व्हिजन. यापैकी केंद्रीकृत व्हिजनमध्ये केवळ एका विचारसरणीचा सन्मान केला जातो. तर दुसऱ्या व्हिजनमध्ये सर्व विचार, संस्कृती आणि देशातील विविध लोकांचा सन्मान केला जातो."असे ते म्हणाले.  

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी