शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 11:20 IST

मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र...

कोच्ची - मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत केली नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी केरळमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केरळमधील पुराबाबत केंद्राने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. "केंद्र सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत करणे आवश्यक होते. हे केरळच्या लोकांचे ऋण आहे. हा त्यांचा हक्क आहे. मात्र केंद्र सरकारने जेवढी करणे आवश्यक असते तेवढी मदत केली नाही, याचे मला दु:ख आहे,"असे राहुल गांधी म्हणाले. तसेच मी येथे केरळच्या जनतेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. मी काल केरळमधील अनेक मदत केंद्रांना भेट दिली. तेथे राहत असलेले लोक पुनर्वसनाबाबत चिंतीत आहेत. मी केरळण्याच मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा केली. या घडीला पुरात नुकसान झालेल्या घरांचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन सरकारने देणे आवश्यक आहे. तसेच नुकसान भरपाई देण्याच्या आश्वासनाची पूर्तताही लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपावरही जोरदार टीका केली. "भारतात दोन व्हिजन आहेत. एक केंद्रीकृत व्हिजन आणि दुसरा विकेंद्रित व्हिजन. यापैकी केंद्रीकृत व्हिजनमध्ये केवळ एका विचारसरणीचा सन्मान केला जातो. तर दुसऱ्या व्हिजनमध्ये सर्व विचार, संस्कृती आणि देशातील विविध लोकांचा सन्मान केला जातो."असे ते म्हणाले.  

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी