शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Kerala floods: कोची, मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी नेदरलँड्स पॅटर्न वापरता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 13:02 IST

Kerala floods: नेदरलँडसने आपल्या देशाला पुरापासून आणि समुद्राच्या पाण्यापासून कसे वाचवले?

मुंबई-केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे सर्व रस्त्यांना व मोकळ्या जागांना नद्यांचे स्वरुप आले आहे. किनारपट्टीच्या शहरांमध्ये पावसाळ्यात पुरामुळे अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबई किंवा कोचीसारख्या शहरांमध्ये प्रशासन हवालदिल होते, तसेच लोकांच्या संपत्तीचे नुकसानही होते. अनेक लोकांचे प्राण जातात. 

समुद्राचे पाणी आत शिरण्याचा धोका जगातील अनेक शहरांना आहे न्यूयाँर्क, व्हेनिस ही शहरेद्धा पाण्याच्या काठावरच आहेत. पण समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँड्सला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे. 

नेदरलँड्स हा देश चक्क समुद्रसपाटीच्या पातळीपासून खाली आहे. या देशाचा दोन तृतियांश प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून केवळ तीन फुट किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. अॅमस्टरडॅम, रॉटरडॅम आणि हेग या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी भरण्याचा सतत धोका असतो. समुद्रसपाटीपासून जमिन खाली असल्यामुळे नेदरलँडमध्ये गेली हजारो वर्षे पूर येत असल्याचा इतिहास असून तितकीच वर्षे ते पाण्याशी झगडत आहेत. समुद्राचे पाणी आत येऊ नये यासाठी त्यांनी डाइक म्हणजे रुंद बांध बांधायला सुरुवात केली.१९१६ साली झोडोर्झे शहरात आलेल्या पुरामुळे डच लोकांनी एक मोठा डाइक बांधून पाणी अडवले. या बांधावरुन रस्ताही जातो व त्याने अडवलेल्या पाण्यामुळे मोठा जलाशयही तयार झाला आहे. १९३२ साली हा डाइक बांधून तयार झाला. काही डच तज्ज्ञांनी व नाँर्वेजियन कंपन्यांनी मुंबईचा कोस्टल रोडही असाच किनाऱ्यापासून पाचशे मीटर पाण्यात डाइकवर बांधावा अशी सूचना केली होती. हा डाईक पूर्ण बांधावा लागणार नाही, त्यासाठी काही नैसर्गिक खडकरचनेचाही आधार म्हणून वापर होईल तसेच किनारा व डाइक यामधील जागेचा वापर होल्डींग पाँडसारखा वापर होईल त्यात पुराचे पाणी वाहून जाता येईल व शहराला धोका पोहोचणार नाही. 

डचांना समुद्राच्या पाण्याबरोबर समुद्राला वाहात जाऊन मिळणाऱ्या नद्यांपासूनही धोका आहे. त्यामुळे नदी पात्राजवळ रुम ऑफ वॉटर म्हणजेच थोडी मोकळी जागा सोडण्यात आली. नदीला वळणे जास्त असली की तिचा वेग कमी होतो म्हणून तशीही योजना करण्यात आली. तसेच नदीच्या गाळाच्या मैदानाची खोली वाढवण्यात आली. गाळाची मैदाने उथळ व सपाट असल्यामुळे तेथे पाणी साठण्याचा धोका जास्त असतो, त्यांची खोली वाढवून तो धोका कमी केला गेला. नदीला मिळणाऱ्या लहान प्रवाहांचे व उपनद्यांची खोलीही वाढवून पाणी जास्तीत जास्त पात्रात राहावे, ते बाहेर येऊ नये अशी योजना केली गेली. याबरोबरच मेस्लांटकेरिंग नावाचे लोखंडी गेटही बांधून समुद्राचे पाणी शहरांमध्ये घुसू नये अशी व्यवस्था केली गेली. 

डचांसाठी पाणी भरणे हे नेहमीचे व प्राचिन  संकट असल्यामुळे डाइक बांधायला ११ व्या शतकातच सुरुवात झाली होती. तसेच जमिन कोरडी राहावी म्हणून पाणी उपसण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जाऊ लागला. सर्वात पहिली पवनचक्की १५ व्या शतकात बांधली गेली. आज या पवनचक्क्या ऐतिहासिक सहलींची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. नेदरलँड्सने किनाऱ्याची होणारी सततची धूप ओळखून वाळूचे पुन्हा संचयन व्हावे यासाठू कृत्रिमरित्या वाळू किनाऱ्याजवळ टाकायला सुरुवात केली. यामुळे किनाऱ्याची होणारी धूप कमी झाली व सतत हे संचयन केल्यामुळे हानी टळली. 

स्टॉर्म सर्ज वॉर्निंग सर्विसनेदरलँड्सने स्टॉर्म सर्ज वॉर्निंग सर्विस नावाने एक सेवा सुरु केली आहे. यात पुराची सूचना , तीव्रता आधीच समजत असल्याने लोकांना तशा सूचना देऊन सुरक्षित जागी हलवण्यात येते. किनारा व डाइकच्या जवळ राहणारे लोक आधी सुरक्षित ठिकाणी नेले जातात. नेदरलँड्सने नदी जवळचे काही प्रदेश संभाव्य पुराच्या जागा म्हणून रिकाम्या केल्या आहेत. पुराच्या वेळेस पाणी या प्रदेशात पाणी साठावे आणि इतर भागात पसरू नये असा त्यामागचा हेतू आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळMumbaiमुंबई