शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

Kerala floods: कोची, मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी नेदरलँड्स पॅटर्न वापरता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 13:02 IST

Kerala floods: नेदरलँडसने आपल्या देशाला पुरापासून आणि समुद्राच्या पाण्यापासून कसे वाचवले?

मुंबई-केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे सर्व रस्त्यांना व मोकळ्या जागांना नद्यांचे स्वरुप आले आहे. किनारपट्टीच्या शहरांमध्ये पावसाळ्यात पुरामुळे अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबई किंवा कोचीसारख्या शहरांमध्ये प्रशासन हवालदिल होते, तसेच लोकांच्या संपत्तीचे नुकसानही होते. अनेक लोकांचे प्राण जातात. 

समुद्राचे पाणी आत शिरण्याचा धोका जगातील अनेक शहरांना आहे न्यूयाँर्क, व्हेनिस ही शहरेद्धा पाण्याच्या काठावरच आहेत. पण समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँड्सला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे. 

नेदरलँड्स हा देश चक्क समुद्रसपाटीच्या पातळीपासून खाली आहे. या देशाचा दोन तृतियांश प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून केवळ तीन फुट किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. अॅमस्टरडॅम, रॉटरडॅम आणि हेग या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी भरण्याचा सतत धोका असतो. समुद्रसपाटीपासून जमिन खाली असल्यामुळे नेदरलँडमध्ये गेली हजारो वर्षे पूर येत असल्याचा इतिहास असून तितकीच वर्षे ते पाण्याशी झगडत आहेत. समुद्राचे पाणी आत येऊ नये यासाठी त्यांनी डाइक म्हणजे रुंद बांध बांधायला सुरुवात केली.१९१६ साली झोडोर्झे शहरात आलेल्या पुरामुळे डच लोकांनी एक मोठा डाइक बांधून पाणी अडवले. या बांधावरुन रस्ताही जातो व त्याने अडवलेल्या पाण्यामुळे मोठा जलाशयही तयार झाला आहे. १९३२ साली हा डाइक बांधून तयार झाला. काही डच तज्ज्ञांनी व नाँर्वेजियन कंपन्यांनी मुंबईचा कोस्टल रोडही असाच किनाऱ्यापासून पाचशे मीटर पाण्यात डाइकवर बांधावा अशी सूचना केली होती. हा डाईक पूर्ण बांधावा लागणार नाही, त्यासाठी काही नैसर्गिक खडकरचनेचाही आधार म्हणून वापर होईल तसेच किनारा व डाइक यामधील जागेचा वापर होल्डींग पाँडसारखा वापर होईल त्यात पुराचे पाणी वाहून जाता येईल व शहराला धोका पोहोचणार नाही. 

डचांना समुद्राच्या पाण्याबरोबर समुद्राला वाहात जाऊन मिळणाऱ्या नद्यांपासूनही धोका आहे. त्यामुळे नदी पात्राजवळ रुम ऑफ वॉटर म्हणजेच थोडी मोकळी जागा सोडण्यात आली. नदीला वळणे जास्त असली की तिचा वेग कमी होतो म्हणून तशीही योजना करण्यात आली. तसेच नदीच्या गाळाच्या मैदानाची खोली वाढवण्यात आली. गाळाची मैदाने उथळ व सपाट असल्यामुळे तेथे पाणी साठण्याचा धोका जास्त असतो, त्यांची खोली वाढवून तो धोका कमी केला गेला. नदीला मिळणाऱ्या लहान प्रवाहांचे व उपनद्यांची खोलीही वाढवून पाणी जास्तीत जास्त पात्रात राहावे, ते बाहेर येऊ नये अशी योजना केली गेली. याबरोबरच मेस्लांटकेरिंग नावाचे लोखंडी गेटही बांधून समुद्राचे पाणी शहरांमध्ये घुसू नये अशी व्यवस्था केली गेली. 

डचांसाठी पाणी भरणे हे नेहमीचे व प्राचिन  संकट असल्यामुळे डाइक बांधायला ११ व्या शतकातच सुरुवात झाली होती. तसेच जमिन कोरडी राहावी म्हणून पाणी उपसण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जाऊ लागला. सर्वात पहिली पवनचक्की १५ व्या शतकात बांधली गेली. आज या पवनचक्क्या ऐतिहासिक सहलींची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. नेदरलँड्सने किनाऱ्याची होणारी सततची धूप ओळखून वाळूचे पुन्हा संचयन व्हावे यासाठू कृत्रिमरित्या वाळू किनाऱ्याजवळ टाकायला सुरुवात केली. यामुळे किनाऱ्याची होणारी धूप कमी झाली व सतत हे संचयन केल्यामुळे हानी टळली. 

स्टॉर्म सर्ज वॉर्निंग सर्विसनेदरलँड्सने स्टॉर्म सर्ज वॉर्निंग सर्विस नावाने एक सेवा सुरु केली आहे. यात पुराची सूचना , तीव्रता आधीच समजत असल्याने लोकांना तशा सूचना देऊन सुरक्षित जागी हलवण्यात येते. किनारा व डाइकच्या जवळ राहणारे लोक आधी सुरक्षित ठिकाणी नेले जातात. नेदरलँड्सने नदी जवळचे काही प्रदेश संभाव्य पुराच्या जागा म्हणून रिकाम्या केल्या आहेत. पुराच्या वेळेस पाणी या प्रदेशात पाणी साठावे आणि इतर भागात पसरू नये असा त्यामागचा हेतू आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळMumbaiमुंबई