शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

"वायनाड दुर्घटनेनंतर काही तासांनी मिळाला अलर्ट", अमित शाहांच्या दाव्यावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 20:04 IST

Wayanad landslides : मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, या भागासाठी कोणताही रेड अलर्ट नाही. मात्र, या घटनेनंतर काही तासांनी अलर्ट जारी करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्या दाव्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  वायनाड भूस्खलनाच्या (Wayanad landslides) घटनेपूर्वी कोणताही रेड अलर्ट जारी करण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले. तसंच, आरोप-प्रत्यारोपांची ही वेळ नसल्याचेही ते म्हणाले. 

वृत्तानुसार, मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, या भागासाठी कोणताही रेड अलर्ट नाही. मात्र, या घटनेनंतर काही तासांनी अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत सांगितलं की, आपत्तीचा अंदाज लक्षात घेऊन केरळ सरकारला आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता. तसंच, आपत्तीपूर्वी जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे बहुतांश राज्ये लक्ष देतात, मात्र, केरळ सरकारनं आपत्तीबाबत जारी केलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, असं अमित शाह यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, वायनाडमध्ये बचावकार्य सुरू आहे. ही एक वेदनादायक आपत्ती आहे. आतापर्यंत १४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये ७९ पुरुष आणि ६४ महिला आहेत. तसंच, १९१ लोक अजूनही बेपत्ता आहेत. आपत्तीग्रस्त भागातून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, असं पिनाराई विजयन यांनी सांगितलं.

काय म्हणाले अमित शाह?सभागृहात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सुरुवातीला भूस्खलनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसंच, या आपत्तीबाबत काही माहिती सभागृहात सांगितली. अमित शाह म्हणाले की, "२३ तारखेलाच एनडीआरएफच्या ९ टीम केरळला पाठवल्या होत्या. केरळ सरकारला केंद्र सरकारनं २३ जुलै रोजीच पूर्व इशारा दिला होता. केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजीही पूर्वसूचना देण्यात आली होती. २६ जुलैला २० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं आम्ही आधीच सांगितलं होतं. केरळ सरकारनं काय केलं? लोकांचं स्थलांतर केलं नाही. स्थलांतर केलं असतं, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता."

वायनाड भूस्खलनावर राहुल गांधी काय म्हणाले?"वायनाडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. जवान चांगलं काम करत आहेत. अशा कठीण प्रसंगी वायनाडच्या लोकांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे. मी सरकारला तात्काळ मदतीची विनंती करतो. वायनाडमध्ये दुसऱ्यांदा अशी दुर्घटना घडली आहे. ५ वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. या भागात पर्यावरणीय समस्या आहे, म्हणून याकडं लक्ष दिलं पाहिजं आणि जे काही हाय-टेक उपाय केले जाऊ शकतात, ते करण्यात यावे", अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlandslidesभूस्खलनKeralaकेरळ