शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Boat Tragedy: केरळ बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ३ लहान मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:18 IST

मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर येथे डबर डेकर पर्यटक बोट पलटल्याने ही दुर्घटना घडली. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली

मलप्पुरम - केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात थूवलथीराम तटाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा २२ पर्यंत पोहचला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ लोकांचा जीव गेला. त्यात ३ लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर येथे डबर डेकर पर्यटक बोट पलटल्याने ही दुर्घटना घडली. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. त्यात ८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोटीत ३० पेक्षा अधिक प्रवासी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोठ्या संख्येने स्थानिक लोक दुर्घटनेतील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बोट रोखण्यासाठी लोकांची रस्सीचा वापरही केला. 

स्थानिक मीडियानुसार, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत अधिकाधिक मुलांचा समावेश आहे. जे सुट्ट्यांमुळे फिरायला चालले होते. अनेकांनी लाईफ जॅकेटही घातले नव्हते असं केरळचे क्रिडा आणि मत्स्य पालन मंत्री अब्दुर्रहमन यांनी सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळ बोट दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत शोध सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पनियारी विजयन यांनी दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे तर पंतप्रधान कार्यालयाकडूनही अपघातातील पीडितांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचं जाहीर केले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात