शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

महाप्रलयावर मात करत पर्यटनासाठी केरळ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:03 IST

नीलाकुरूंजी पर्यटकांच्या प्रतीक्षेत; केरळ पर्यटन विभागाची माहिती

मुंबई : महाप्रलयानंतर उद्ध्वस्त झालेले केरळ पुन्हा एकदा उभे राहिल्याची माहिती केरळपर्यटन विभागाने शनिवारी दिली आहे. केरळ प्रशासनाने तातडीने यासंदर्भात दुरुस्तीची कामे हाती घेत रस्ते, पाणी, वीज या समस्या सोडविल्या असून, पर्यटकांसाठी केरळ सज्ज असल्याचा दावाही केरळ पर्यटन विभागाने केला आहे. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित मेळाव्यात पर्यटन विभागाकडून पर्यटकांमध्ये सद्य:स्थितीबाबत जनजागृती केली जात आहे. पर्यटकांना या मेळाव्यात मोफत प्रवेश दिला जाणार असून रविवारी, ७ ऑक्टोबरला मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.महाप्रलयामुळे रस्त्यांसह वीज आणि पाण्याची मोठी समस्या केरळमध्ये निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने तातडीची पावले उचलत या समस्येवर मात केली आहे. त्यामुळे येथील पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही. येथील जनजीवन सुरळीत झाले असून पर्यटकांनी मोठ्या संख्येने केरळला भेट देण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे. केरळमधील आकर्षणांबाबत माहिती देण्यासाठी केरळ पर्यटन विभागातर्फे या मेळाव्यात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.केरळसोबत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथील राज्य शासनाच्या पर्यटन विभागांनीही आपापल्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी मेळाव्यात भाग घेतला आहे. केरळसह देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढीसाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.नीलाकुरूंजी उत्सवाचे आयोजनतब्बल १२ वर्षांतून एकदाच फुलणाºया ‘नीलाकुरींजी’ यांचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू झाला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही फुले पूर्णपणे फुलतात. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलांना पाहण्यासाठी रोज सरासरी ४ ते ५ हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात. या ऐतिहासिक उत्सवासाठी वन विभागाकडून दर १२ वर्षांतून एकदा विशेष परवानगी दिली जाते. याआधी हा उत्सव २००६ साली झाला होता. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरtourismपर्यटन