शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवाल यांचं 'ट्विट चर्चेत'

By महेश गलांडे | Updated: February 23, 2021 17:07 IST

गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय.

ठळक मुद्देगुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. (Gujarat municipal election 2021 Result ) आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाने सहा पैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे. तर, सुरतमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकले आहे. त्यामुळे, येथील निकालानंतर आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचं ट्विट चर्चेत आलं आहे. 

गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवरुन गुजरातमधील नागरिकांचे अभिनंदन केलंय. नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी गुजरातच्या लोकांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन ! असे केजरीवाल यांनी म्हटलंय. केजरीवाल यांच्या पक्षानेही महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे आपला येथील निवडणुकीत चांगलं यशही मिळालं आहे. त्यामुळे, केजरीवाल यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. 

अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल समोर आली असून, त्यामध्ये भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत. सूरतमध्ये आतापर्यंत १२० जागांपैकी ६४ जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपा ५१ तर आप १३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्ष येथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील ७२ पैकी ५२ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAmit Shahअमित शहाElectionनिवडणूक