शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवाल यांचं 'ट्विट चर्चेत'

By महेश गलांडे | Updated: February 23, 2021 17:07 IST

गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय.

ठळक मुद्देगुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. (Gujarat municipal election 2021 Result ) आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाने सहा पैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे. तर, सुरतमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकले आहे. त्यामुळे, येथील निकालानंतर आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचं ट्विट चर्चेत आलं आहे. 

गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवरुन गुजरातमधील नागरिकांचे अभिनंदन केलंय. नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी गुजरातच्या लोकांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन ! असे केजरीवाल यांनी म्हटलंय. केजरीवाल यांच्या पक्षानेही महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे आपला येथील निवडणुकीत चांगलं यशही मिळालं आहे. त्यामुळे, केजरीवाल यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. 

अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल समोर आली असून, त्यामध्ये भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत. सूरतमध्ये आतापर्यंत १२० जागांपैकी ६४ जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपा ५१ तर आप १३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्ष येथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील ७२ पैकी ५२ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAmit Shahअमित शहाElectionनिवडणूक