शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दिल्ली विजयानंतर केजरीवालांची नजर आता देशभरातील स्थानिक निवडणुकांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 12:00 IST

आम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तयार करणार आहोत. त्यानंतर पक्ष देशातील सर्व स्थानिक निवडणुका लढवणार आहे. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 'आप' स्थानिक निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील शानदार विजयानंतर प्रोत्साहित झालेल्या आम आदमी पक्षाने  दिल्लीच्या बाहेर पक्षविस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत 'आप' देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

'आप'चे वरिष्ठ नेते गोपाल राय म्हणाले की, पक्षाने सकारात्मक राष्ट्रवाद घेऊन पुढे जाण्याचे ठरवले आहे. त्यानुसारच पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 'आप' पंजाबसह अनेक राज्यातील निवडणुका लढविणार आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि देशभरात पक्षाचे कॅडर निर्माण करण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यातूनच संघटनेचा विस्तार करण्याची योजना बनविणार असल्याचे राय यांनी म्हटले आहे. 

केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेले राय यांनी, भाजपचा राष्ट्रवादावर टीका केली. भाजपचा राष्ट्रवाद नकारात्मक आहे. मात्र आम आदमी पक्ष सकारात्मक राष्ट्रवादाच्या मुद्दावर पक्षाचा विस्तार करणार आहे. लोक आपच्या राष्ट्र निर्माण अभियानात 9871010101 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सामील होऊ शकतात. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तयार करणार आहोत. त्यानंतर पक्ष देशातील सर्व स्थानिक निवडणुका लढवणार आहे. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 'आप' स्थानिक निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.  

दरम्यान भाजप पक्ष भारतातील लोकांचा सन्मान करत नाही. ते प्रत्येक व्यक्तीकडे केवळ व्होट बँक म्हणूनच पाहात असल्याचा आरोप राय यांनी केला.