शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भाजपचे 'ते' डावपेच वेळीच ओळखल्याने केजरीवालांचा सहज विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:50 IST

मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. काम करणाऱ्यालाच मत मिळेल, असा स्पष्ट संदेश देत दिल्लीकरांनी देशातील राजकारणाला कलाटणी दिल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी डावपेचही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. या डावपेचात केजरीवाल सरस ठरले. भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देणे काँग्रेसला जमलं नाही. मात्र केजरीवालांनी  ते लिलया करून दाखवलं. 

निवडणुकीच्या तयारीचे नियोजनात सध्याच्या घडीला भाजप सर्वोत्तम पक्ष मानला जातो. प्रवक्त्यांची फौज, या फौजेने माध्यमांशी काय बोलायचं, सर्व नेत्यांच्या तोंडात एकावेळी एकच मुद्दा कसा सुरू ठेवायचा याचे नियोजन भाजपकडून करण्यात येते. यात भाजपला माध्यमांची बऱ्यापैकी साथ मिळते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हे पाहायला मिळालेच. एवढं सगळ असताना देखील अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देण्यात यश मिळवलेच. 

भाजपने आपल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या मदतीने याआधी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सहज शह दिला आहे. राहुल गांधी यांनी मंदिरांत जाऊन सौम्य हिंदुत्व स्वीकारले पण भाजपने हा डाव हाणून पाडला. मात्र केजरीवालांनी याला योग्य पद्धतीने शह दिला. दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना एका कार्यक्रमात हनुमान चालीसा येते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवली. भाजपने यावर आगपाखड केली. त्यावर प्रत्युत्तर देताना कॅनॉट येथील हनुमानजींनी मला विजयाचा आशीर्वाद दिल्याचे सांगत केजरीवालांनी भाजपची बोलती बंद झाली. 

या व्यतिरिक्त केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फारसं लक्ष्य केले नाही. तर काँग्रेसच्या रडारवर प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच दिसायचे. केजरीवालांनी मोदींवर टीका करणे टाळले. तसेच शाहीन बाग सांभाळताना हनुमानजींचा आशीर्वाद मिळवला. या आघाड्यांवर भाजपचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला.