शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाजपचे 'ते' डावपेच वेळीच ओळखल्याने केजरीवालांचा सहज विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:50 IST

मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. काम करणाऱ्यालाच मत मिळेल, असा स्पष्ट संदेश देत दिल्लीकरांनी देशातील राजकारणाला कलाटणी दिल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी डावपेचही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. या डावपेचात केजरीवाल सरस ठरले. भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देणे काँग्रेसला जमलं नाही. मात्र केजरीवालांनी  ते लिलया करून दाखवलं. 

निवडणुकीच्या तयारीचे नियोजनात सध्याच्या घडीला भाजप सर्वोत्तम पक्ष मानला जातो. प्रवक्त्यांची फौज, या फौजेने माध्यमांशी काय बोलायचं, सर्व नेत्यांच्या तोंडात एकावेळी एकच मुद्दा कसा सुरू ठेवायचा याचे नियोजन भाजपकडून करण्यात येते. यात भाजपला माध्यमांची बऱ्यापैकी साथ मिळते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हे पाहायला मिळालेच. एवढं सगळ असताना देखील अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देण्यात यश मिळवलेच. 

भाजपने आपल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या मदतीने याआधी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सहज शह दिला आहे. राहुल गांधी यांनी मंदिरांत जाऊन सौम्य हिंदुत्व स्वीकारले पण भाजपने हा डाव हाणून पाडला. मात्र केजरीवालांनी याला योग्य पद्धतीने शह दिला. दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना एका कार्यक्रमात हनुमान चालीसा येते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवली. भाजपने यावर आगपाखड केली. त्यावर प्रत्युत्तर देताना कॅनॉट येथील हनुमानजींनी मला विजयाचा आशीर्वाद दिल्याचे सांगत केजरीवालांनी भाजपची बोलती बंद झाली. 

या व्यतिरिक्त केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फारसं लक्ष्य केले नाही. तर काँग्रेसच्या रडारवर प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच दिसायचे. केजरीवालांनी मोदींवर टीका करणे टाळले. तसेच शाहीन बाग सांभाळताना हनुमानजींचा आशीर्वाद मिळवला. या आघाड्यांवर भाजपचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला.