शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे 'ते' डावपेच वेळीच ओळखल्याने केजरीवालांचा सहज विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:50 IST

मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. काम करणाऱ्यालाच मत मिळेल, असा स्पष्ट संदेश देत दिल्लीकरांनी देशातील राजकारणाला कलाटणी दिल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी डावपेचही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. या डावपेचात केजरीवाल सरस ठरले. भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देणे काँग्रेसला जमलं नाही. मात्र केजरीवालांनी  ते लिलया करून दाखवलं. 

निवडणुकीच्या तयारीचे नियोजनात सध्याच्या घडीला भाजप सर्वोत्तम पक्ष मानला जातो. प्रवक्त्यांची फौज, या फौजेने माध्यमांशी काय बोलायचं, सर्व नेत्यांच्या तोंडात एकावेळी एकच मुद्दा कसा सुरू ठेवायचा याचे नियोजन भाजपकडून करण्यात येते. यात भाजपला माध्यमांची बऱ्यापैकी साथ मिळते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हे पाहायला मिळालेच. एवढं सगळ असताना देखील अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देण्यात यश मिळवलेच. 

भाजपने आपल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या मदतीने याआधी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सहज शह दिला आहे. राहुल गांधी यांनी मंदिरांत जाऊन सौम्य हिंदुत्व स्वीकारले पण भाजपने हा डाव हाणून पाडला. मात्र केजरीवालांनी याला योग्य पद्धतीने शह दिला. दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना एका कार्यक्रमात हनुमान चालीसा येते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवली. भाजपने यावर आगपाखड केली. त्यावर प्रत्युत्तर देताना कॅनॉट येथील हनुमानजींनी मला विजयाचा आशीर्वाद दिल्याचे सांगत केजरीवालांनी भाजपची बोलती बंद झाली. 

या व्यतिरिक्त केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फारसं लक्ष्य केले नाही. तर काँग्रेसच्या रडारवर प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच दिसायचे. केजरीवालांनी मोदींवर टीका करणे टाळले. तसेच शाहीन बाग सांभाळताना हनुमानजींचा आशीर्वाद मिळवला. या आघाड्यांवर भाजपचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला.