शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही; केजरीवालांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 16:25 IST

भाजप आधी मत मागत असून नंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपने करावा, असंही केजरीवाल यांनी नमूद केले.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आपण अमित शाह यांना दिल्लीच्या प्रत्येक मुद्दावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, शाह यांच्याकडून काहीही प्रतिसादन आला नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

जनतेत जाण्यासाठी अमित शाह तयार नाहीत. जनतेच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यायचे नाहीत. हे त्रासदायक आहे. गीतेत लिहिलेले आहे की, मैदान सोडून कधीही पळू नका.  एक खरा हिंदू शूर असतो. मैदान सोडून पळत नाही. अमित शाह यांनी असं मैदान सोडून पळणे योग्य वाटत नाही. ते जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मैदान सोडून पळत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यालयात केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ शाह यांनाच नव्हे तर संपूर्ण भाजपला लक्ष्य केले. भाजपचं हिंदुत्व खोटारड आहे.  यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला हनुमान चालीसा म्हणावी लागत आहे. त्यावर ते म्हणाले की, आपण भाजपच्या सर्व नेत्यांकडून हनुमान चालीसा म्हणून घेणार आहोत.

दरम्यान केजरीवाल यांनी अमित शाह यांना दोन दिवसांपूर्वीच दिल्लीच्या मुद्दांवर चर्चा करण्यासाठी आव्हान दिले होते. त्याला शाह यांनी काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यातच भाजप आधी मत मागत असून नंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपने करावा, असंही केजरीवाल यांनी नमूद केले.