शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मानहानी प्रकरणात केजरीवालांनी काँग्रेस नेत्याची लेखी स्वरूपात मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 17:13 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे.

नवी दिल्ली, दि. 21 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे. काँग्रेस नेते अवतार सिंह भडाना यांनी पतियाळा हाऊस कोर्टात केजरीवालांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून 1 कोटींची नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर केजरीवाल यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. एका सहका-याच्या नादाला लागून ही भडाना यांच्यावर आरोप केल्याचं केजरीवालांनी सांगितलं आहे.केजरीवाल यांनी 31 जानेवारी 2014ला वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भडाना यांनी आरोप केला आहे. भडाना देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्तींमधील एक आहेत. मात्र भडाना यांनी प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भडाना यांनी केजरीवालांच्या त्या विधानाविरोधात न्यायालयात दाद मागितली. केजरीवालांच्या विधानामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचं भडाना म्हणाले आहेत. भडाना यांनी केजरीवालांना कायदेशीर नोटीस पाठवून विधान मागे घेण्यासोबतच बिनशर्त माफीचीही मागणी केली होती. त्यानंतर केजरीवालांनी विधान मागे  घेण्यासोबतच भडाना यांची माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज पटियाळा हाऊस कोर्टात भडाना यांना लेखी स्वरूपात केजरीवालांना माफीनामा दिला आहे. सहका-याच्या नादाला लागून मी आरोप लावल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. चौकशीतून त्या आरोपांची शहानिशा झाली नाही. त्यामुळेच मी माफी मागितल्याचं केजरीवाल म्हणाले. तसेच भडाना यांच्या आरोप करून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा माझा कोणताही उद्देश नसल्याचंही ते म्हणाले आहेत. भडाना यांच्याशिवाय केजरीवालांविरोधात अनेक मानहानीची प्रकरणं दाखल आहेत.अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याचीही कोर्टात केस सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांविरोधात जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी जेटलींना अपमानास्पद प्रश्न विचारू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आपच्या नेत्यांना दिले होते. तसेच या प्रकरणात कोर्टानं केजरीवालांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केंद्रीय अर्थमंत्री जेटलींशी सन्मानानं आणि कायद्याच्या भाषेनुसार त्यांचा आदर केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे. न्यायालयात अभद्र भाषेचा कोणीही वापर करू नये. तसेच मानहानी खटल्यात योग्य रीतीनं जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. जेटली मानहानी प्रकरणात केजरीवालांसह राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह आणि दीपक वाजपेयींनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. अरुण जेटलींनी 2000 ते 2013मध्ये डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. जेटलींनी ते आरोप फेटाळूनही लावले आहेत. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टी