शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

मानहानी प्रकरणात केजरीवालांनी काँग्रेस नेत्याची लेखी स्वरूपात मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 17:13 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे.

नवी दिल्ली, दि. 21 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे. काँग्रेस नेते अवतार सिंह भडाना यांनी पतियाळा हाऊस कोर्टात केजरीवालांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून 1 कोटींची नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर केजरीवाल यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. एका सहका-याच्या नादाला लागून ही भडाना यांच्यावर आरोप केल्याचं केजरीवालांनी सांगितलं आहे.केजरीवाल यांनी 31 जानेवारी 2014ला वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भडाना यांनी आरोप केला आहे. भडाना देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्तींमधील एक आहेत. मात्र भडाना यांनी प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भडाना यांनी केजरीवालांच्या त्या विधानाविरोधात न्यायालयात दाद मागितली. केजरीवालांच्या विधानामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचं भडाना म्हणाले आहेत. भडाना यांनी केजरीवालांना कायदेशीर नोटीस पाठवून विधान मागे घेण्यासोबतच बिनशर्त माफीचीही मागणी केली होती. त्यानंतर केजरीवालांनी विधान मागे  घेण्यासोबतच भडाना यांची माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज पटियाळा हाऊस कोर्टात भडाना यांना लेखी स्वरूपात केजरीवालांना माफीनामा दिला आहे. सहका-याच्या नादाला लागून मी आरोप लावल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. चौकशीतून त्या आरोपांची शहानिशा झाली नाही. त्यामुळेच मी माफी मागितल्याचं केजरीवाल म्हणाले. तसेच भडाना यांच्या आरोप करून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा माझा कोणताही उद्देश नसल्याचंही ते म्हणाले आहेत. भडाना यांच्याशिवाय केजरीवालांविरोधात अनेक मानहानीची प्रकरणं दाखल आहेत.अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याचीही कोर्टात केस सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांविरोधात जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी जेटलींना अपमानास्पद प्रश्न विचारू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आपच्या नेत्यांना दिले होते. तसेच या प्रकरणात कोर्टानं केजरीवालांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केंद्रीय अर्थमंत्री जेटलींशी सन्मानानं आणि कायद्याच्या भाषेनुसार त्यांचा आदर केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे. न्यायालयात अभद्र भाषेचा कोणीही वापर करू नये. तसेच मानहानी खटल्यात योग्य रीतीनं जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. जेटली मानहानी प्रकरणात केजरीवालांसह राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह आणि दीपक वाजपेयींनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. अरुण जेटलींनी 2000 ते 2013मध्ये डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. जेटलींनी ते आरोप फेटाळूनही लावले आहेत. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टी