शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kedarnath Yatra: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवली; अमरनाथ दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 18:10 IST

अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी ढगफुटीमुळे १६ जणांचा मृत्यू; अनेक जण अजूनही बेपत्ता

Kedarnath Yatra: उत्तराखंडमध्ये सुरू असलेली केदारनाथ यात्रा प्रशासनाने थांबवली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने सावधानतेची पावले उचलत तत्काळ प्रभावाने केदारनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये आणि प्रवासी सुरक्षित राहावेत यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. या संदर्भात माहिती देताना, रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने सांगितले की, कोणतीही अनुचित घटना घडू शकतो या भीतीने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी, सोनप्रयागमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

रूद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाकडून यात्रेकरूंना आवाहन करण्यात आले आहे की, सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता बंद आहे. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. उत्तराखंड पोलिसांच्या सतत संपर्कात राहा. दुसऱ्याच्या सांगण्यावरून इतर मार्गाचा वापर करू नका. पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियोजित मार्गांचाच वापर करा. हवामान खात्याने आधीच अलर्ट जारी केला होता आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात बऱ्याच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरडही पडली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडून २ महिन्यांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत ९ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

दरम्यान, काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. गुहेजवळ आलेल्या जोरदार पुरात अनेक भाविक वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत १५-१६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर सुमारे ४० लोक अद्यापही बेपत्ता असल्याचेच सांगण्यात येत आहे. या परिसरात लावण्यात आलेले तंबूदेखील उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हाहा:कार माजला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लष्कराकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंडAmarnath Yatraअमरनाथ यात्रा