शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

Kedarnath Yatra: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवली; अमरनाथ दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 18:10 IST

अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी ढगफुटीमुळे १६ जणांचा मृत्यू; अनेक जण अजूनही बेपत्ता

Kedarnath Yatra: उत्तराखंडमध्ये सुरू असलेली केदारनाथ यात्रा प्रशासनाने थांबवली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने सावधानतेची पावले उचलत तत्काळ प्रभावाने केदारनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये आणि प्रवासी सुरक्षित राहावेत यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. या संदर्भात माहिती देताना, रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने सांगितले की, कोणतीही अनुचित घटना घडू शकतो या भीतीने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी, सोनप्रयागमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

रूद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाकडून यात्रेकरूंना आवाहन करण्यात आले आहे की, सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता बंद आहे. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. उत्तराखंड पोलिसांच्या सतत संपर्कात राहा. दुसऱ्याच्या सांगण्यावरून इतर मार्गाचा वापर करू नका. पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियोजित मार्गांचाच वापर करा. हवामान खात्याने आधीच अलर्ट जारी केला होता आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात बऱ्याच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरडही पडली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडून २ महिन्यांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत ९ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

दरम्यान, काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. गुहेजवळ आलेल्या जोरदार पुरात अनेक भाविक वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत १५-१६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर सुमारे ४० लोक अद्यापही बेपत्ता असल्याचेच सांगण्यात येत आहे. या परिसरात लावण्यात आलेले तंबूदेखील उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हाहा:कार माजला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लष्कराकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंडAmarnath Yatraअमरनाथ यात्रा