शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:01 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे; पण प्रचार सभांमध्ये सर्वसामान्य लोक यंदा नेत्यांना सवाल विचारू लागले आहेत.

- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे; पण प्रचार सभांमध्ये सर्वसामान्य लोक यंदा नेत्यांना सवाल विचारू लागले आहेत. येथील टीआरएस सरकारविरोधात असलेला असंतोषही लोकांमधून व्यक्त करताना दिसत आहे. कागज नगरमध्ये प्रचार फेरीतील सभेच्या वेळी एका मतदाराने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मुस्लिमांना आरक्षण कधी देणार, असा सवाल केला आणि तो ऐकून मुख्यमंत्र्यांचा पाराच चढला.अचानक आलेल्या प्रश्नामुळे काहीशा गोंधळलेल्या केसीआर यांनी अन्य लोकांसमोरच त्या तरुण मतदाराचा बाप काढला. एरव्ही शांत दिसणाऱ्या केसीआर यांचा हा अवतार पाहून प्रचारफेरीतील कार्यकर्तेही आवाक झाले होते. चुपचाप बस, हा तमाशा बंद कर, असे त्यांनी त्या तरुण मतदाराला ऐकवले. त्यावर माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, असे तो म्हणाला. त्यामुळे आणखी चिडलेल्या के. चंद्रेशखर राव यांनी असे आरक्षण लगेच मिळते की काय?, गप्प बस, तुझ्या बापाशी बोलू की काय?, असे त्याला सुनावले. तोपर्यंत टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला खेचले, तर सभेला आलेल्या अन्य लोकांनीही त्याला शांत केले. त्यानंतर केसीआर यांचे भाषण पुन्हा सुरू झाले. मात्र त्यांच्या या भाषेमुळे सर्वांनाच धक्का बसला.वास्तविक तेलंगणा राष्ट्र समितीने मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही नोकरी आणि शिक्षणामध्ये मुस्लिमांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे केसीआर सरकार फसवणूक करीत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, मुस्लीम समाजाबरोबरच विद्यार्थी, शेतकरी, महिलांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे केसीआर यांनी भाषणात वारंवार सांगितले. पण ही आश्वासने पोकळ ठरल्याने लोकांचा त्यांच्यावर राग आहे. त्याच मुस्लिमांना १२ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून त्याची कधी अंमलबजावणी करणार, असा सवाल या तरुण मतदाराने विचारल्याने ते संतापले होते.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा प्रकार म्हणजे विरोधकांची खेळी असल्याचे केसीआर म्हणाले. एखाद्या कार्यकर्त्यांला विरोधक दारू पाजून असे अडचणीचे प्रश्न विचारायला भाग पाडतात, असेही ते म्हणाले. मात्र त्या तरुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने मी ते बोलून गेलो. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.>काँग्रेसची टीकापण या प्रकारामुळे चंद्रेशखर राव यांची वर्तणूक आणि स्वभाव यांवर टीका करण्याची संधीच काँग्रेसला मिळाली. राव हे नवाबासारखे वागतात, त्यांना लोकांनी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. प्रश्न विचारताच, त्यांचा ते अपमान करतात; पण ही लोकशाही आहे, राजेशाही वा हुकूमशाही नाही, हे राव यांनी लक्षात ठेवावे. अर्थात, त्यांना थोड्याच दिवसांत ते कळेलच, असे काँग्रेसने म्हटले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018