शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

"केसीआरच तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील"; औवेसींनी MIM चेही भविष्य सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:48 IST

तेलंगणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपानेही शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे.

हैदराबाद - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाने दक्षिण भारतातील तेलंगणावरही यंदा फोकस केलं आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर, एमआयएमनेही ९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र, केसीआर हेच तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत असदुद्दीन ओवैसींनी केले आहे. तसेच, एमआयएमच्या उमेदवारांचं काय होणार, हेही त्यांनी सांगितलं. 

तेलंगणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपानेही शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास राज्यातील महिलांना दरमहा ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, सामाजिक पेन्शन, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात आणि मोफत बस प्रवास यांसारख्या सुविधांमध्ये हा लाभ महिलांना मिळेल, अशीही घोषणा राहुल गांधींनी केली. 

तेलंगणात केसीआर म्हणजेच चंद्रशेखर राव हेच मुख्यमंत्री होतील, असे AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तिसऱ्यांदा भाकीत केलं आहे. तेलंगणात जनतेच्या आशिर्वादाने एमआयएमचे ९ उमेदवार विजयी होणार आहेत. मला विश्वास आहे की, तेलंगणातील जनता केसीआर यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करेल. पंतप्रधान मोदी फक्त एकच म्हणतील की, स्टेअरींग ओवैसींच्या हातात आहे. तर, राहुल गांधी म्हणतील की, ओवैसी ही भाजपाची बी टीम आहे. हे दोन्ही नेत्यांचे पेटंट डायलॉग आहेत आणि २८ नोव्हेंबरपर्यंत ते फक्त एवढेच सांगतील, असे म्हणत काँग्रेस आणि भाजपावरही ओवैसींनी निशाणा साधला.

वायएसआर तेलंगणाचा काँग्रेसला पाठिंबा

अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची 'भ्रष्ट आणि लोकविरोधी राजवट' संपवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. शर्मिला म्हणाल्या की, राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असताना सरकारविरोधी मतांचे विभाजन करून अडसर बनायचे नाही. तसेच, काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला यांनी तेलंगणातील जनतेला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनChief Ministerमुख्यमंत्री