Katra-Srinagar Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. या एक्सप्रेस ट्रेनमुळे कटरा ते श्रीनगर हे अंतर फक्त ३ तासांवर आले आहे. पूर्वी रस्त्याने जाण्यासाठी ६-७ तास लागायचे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमांडोतैनावंदे भारत ट्रेन सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याचा मार्ग सोपा झाला आहे. पण, या भागातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता, विशेषतः २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी विशेष प्रशिक्षित कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक कोचमध्ये दोन कमांडो तैनात करण्यात आले असून, ते अत्याधुनिक शस्त्रे, बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि इतर हाय-टेक गॅझेट्सने सुसज्ज आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षेचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना काश्मीर खोऱ्यात प्रवास करताना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही.
सुरक्षा दलांचा संयुक्त सराव१६ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीर पोलिस आणि रेल्वे संरक्षण दलासोबत NSG ने कटरा रेल्वे स्थानकावर ट्रेन इंटरव्हेंशन सराव केला. या सरावाचे उद्दिष्ट दहशतवादी धोक्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा दलांमध्ये समन्वय आणि तयारी वाढवणे होते. एनएसजीच्या या उपक्रमामुळे रेल्वे आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यासाठीची रणनीती अधिक मजबूत झाली आहे.
ट्रेनमध्ये हाय-टेक सुविधारेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही ट्रेन -२० अंश सेल्सिअस पर्यंत तापमानासारख्या हिमालयातील कठीण परिस्थितीतही सुरळीत चालण्यासाठी डिझाइन केलेली आहे. यात स्वयंचलित दरवाजे हीटिंग सिस्टम आणि अँटी-स्पॉल लेयर सारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधा आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने, ट्रेनमध्ये प्रवाशांची तपासणी आणि इतर सुरक्षा प्रोटोकॉल देखील लागू करण्यात आले आहेत.
प्रमुख स्थानकांवर विशेष सुरक्षा रेल्वे बोर्डाने कटरा, रियासी, सांगलदान, बनिहाल, काझीगुंड, अनंतनाग आणि श्रीनगर सारख्या प्रमुख स्थानकांवर विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. ही ट्रेन केवळ कनेक्टिव्हिटीला चालना देणार नाही तर पर्यटन आणि व्यवसायालाही प्रोत्साहन देईल.