शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 11:39 IST

टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांमुळे काश्मिरी पंडित भयभीत झाले असून, आता सामूहिक स्थलांतराच्या तयारीत आहेत.

जम्मू: दक्षिण काश्मीर भागातील कुलगाम जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत दोन काश्मिरी पंडितांच्या झालेल्या हत्यांमुळे जम्मू-काश्मीर हादरून गेले आहे. याचा परिणाम म्हणून काश्मिरी पंडितांनी सामूहिकरित्या खोरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी १८०० काश्मिरी पंडितांनी जम्मू खोऱ्यातून स्थलांतर केले असून, सुमारे ३ हजार सरकारी तसेच अन्य कर्मचारी जम्मूत दाखल झाले आहेत. श्रीनगरच्या अनेक भागात काश्मिरी पंडितांची निवासस्थाने तसेच संबंधित परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच निमलष्करी पथकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्यांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर पुन्हा एकदा जम्मू खोऱ्यात तणावाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये स्थानिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत एनएसए अजित डोवालही उपस्थित राहणार आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालल्याचे बोलले जात आहे. 

खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्याची घोषणा

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले असून, आता सामूहिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांनंतर आता काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काश्मिरी पंडितांनी ठरवले आहे की, ज्या भागात काश्मिरी पंडित आंदोलन करत होते, ते त्वरित बंद करण्यात येईल. काश्मीरमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांसमोर आता दुसरा पर्याय उरला नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत सर्व लोकांना बनिहालच्या नवयुग बोगद्याजवळ एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात राहणारे आंदोलक रंजन झुत्शी म्हणाले की, गेल्या २२ दिवसांपासून सर्वजण आंदोलन करत आहेत. आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. विजय कुमार आणि रजनी बाला यांची निर्घृण हत्या झाली. ज्या दिवशी राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्या दिवशी आम्ही सांगितले होते की, आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढा. जसे आम्ही १९९० मध्ये स्थलांतरित झालो होतो, त्याप्रकारे आताही जावे लागत आहे. सुमारे ३००० कर्मचारी आधीच जम्मूमध्ये पोहोचले आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर